शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:12 IST

अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. चालू घडामोडींना (करंट इव्हेंन्टस) जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ...

अभिजित कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. चालू घडामोडींना (करंट इव्हेंन्टस) जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे. विविध विषयांच्या घडामोडींची सातत्याने नोंद ठेवणे आवश्यक आहे. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रांचे वाचन करत असताना आता त्याचबरोबर आता इंटरनेटचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अनेक क्लास ऑनलाइन माध्यमातून होत आहे. ते सर्व इंटनेटवर उपलब्ध आहे. त्याचा वापर करत विविध विषयांच्या घडामोडींच्या सातत्याने नोंदी ठेवाव्यात. परीक्षेमध्ये त्याचा खूपच फायदा होतो, असा सल्ला केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात पुणे येथे उपसंचालक पदावर कार्यरत असलेले डाॅ. मोतीलाल शेटे देतात.

यूपीएससीच्या परीक्षामध्ये दोनदा निवड झालेले आणि एमबीबीएस असलेले डॉ. मोतीलाल शेटे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार तर्फे उदगाव येथील आहेत. सन २०१२ साली पहिल्यांदा भारतीय रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (आयआरटीएस) मध्ये निवड झाली. त्यांनतर सन २०१४ मध्ये भारतीय आयकर विभागात (आयआरएस-वस्तू व सेवा कर) निवड झाली आहे. सुरुवातीचे दोन वर्षे औरंगाबाद येथे नेमणूक झाली होती. तर आता केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण मूळ गावी तसेच इस्लामपूर येथे झाले आहे. आई गृहिणी तर वडील स्टेट बॅंकेत नोकरीला होते. यूपीएससीच्या तयारीसाठी घरातून पाठिंबा होता. त्यामुळे अभ्यास करताना पूर्ण फोकसने अभ्यास केल्यामुळे लवकर यशस्वी झालो, असे डॉ. शेटे सांगतात.

परीक्षा काय प्रकारची आहे. हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला मी खासगी क्लास लावला होता. त्यानंतर मी पूर्णत: वैयक्तिक घरूनच अभ्यास केला. चार-पाच मित्रांचा आमचा चांगला ग्रुप केला होता. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही सातत्याने चर्चा करायचो. त्यामुळे अनेक अवघड विषय, संकल्पना (कन्सेप्ट) समजण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी गटचर्चा (ग्रुप स्टडी) अत्यंत फायदेशीर झाली आहे. एकएकट्याने अभ्यास करताना परीक्षेत काय विचारले जाते, काय वाचायला पाहिजे, यावरचा फोकस हलण्याची, बदलण्याची शक्यता बऱ्याच वेळा चुकत जाते. अनेक विद्यार्थी अनावश्यक असलेली पुस्तके वाचत बसतात. त्यात प्रचंड वेळ, वर्षे वाया जातात. त्यामुळे यूपीएससीच्या परीक्षेत नेमके काय विचारले जात आहे, हे समजणे आणि समजून घेणे फारच आवश्यक आहे.

डॉ. शेटे सांगतात, की पूर्व परीक्षा ही वैकल्पिक प्रकारची असल्याने त्यादृष्टीने नियमितपणे वर्तमानपत्र वाचन करत नोट्स काढणे आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात या नोट्सचा खूप फायदा होतो. मुख्य परीक्षेची मांडणी ही विश्लेषणात्मक असल्याने लेखन सराव फार गरजेचा आहे. मुलाखतीची तयारी करताना सुरुवातीला दोन-तीन क्लासमध्ये मी मुलाखत दिली होती. मात्र, मित्रांबरोबर गटचर्चा करताना सातत्याने मुलाखतीचा सराव केला. मित्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न काढायचे. प्रत्येक मुलाखतीच्या वेळी सराव करताना मित्र अनेक त्रुटी काढायचे. त्यावर मग मी जाणीवपूर्वक सुधारणा केल्या. त्याचा यूपीएससीच्या अंतिम परीक्षेच्या वेळी खूप फायदा झाला आहे.

फोटो : डॉ. मोतीलाल शेटे