शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:12 IST

अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. चालू घडामोडींना (करंट इव्हेंन्टस) जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ...

अभिजित कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. चालू घडामोडींना (करंट इव्हेंन्टस) जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे. विविध विषयांच्या घडामोडींची सातत्याने नोंद ठेवणे आवश्यक आहे. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रांचे वाचन करत असताना आता त्याचबरोबर आता इंटरनेटचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अनेक क्लास ऑनलाइन माध्यमातून होत आहे. ते सर्व इंटनेटवर उपलब्ध आहे. त्याचा वापर करत विविध विषयांच्या घडामोडींच्या सातत्याने नोंदी ठेवाव्यात. परीक्षेमध्ये त्याचा खूपच फायदा होतो, असा सल्ला केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात पुणे येथे उपसंचालक पदावर कार्यरत असलेले डाॅ. मोतीलाल शेटे देतात.

यूपीएससीच्या परीक्षामध्ये दोनदा निवड झालेले आणि एमबीबीएस असलेले डॉ. मोतीलाल शेटे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार तर्फे उदगाव येथील आहेत. सन २०१२ साली पहिल्यांदा भारतीय रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (आयआरटीएस) मध्ये निवड झाली. त्यांनतर सन २०१४ मध्ये भारतीय आयकर विभागात (आयआरएस-वस्तू व सेवा कर) निवड झाली आहे. सुरुवातीचे दोन वर्षे औरंगाबाद येथे नेमणूक झाली होती. तर आता केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण मूळ गावी तसेच इस्लामपूर येथे झाले आहे. आई गृहिणी तर वडील स्टेट बॅंकेत नोकरीला होते. यूपीएससीच्या तयारीसाठी घरातून पाठिंबा होता. त्यामुळे अभ्यास करताना पूर्ण फोकसने अभ्यास केल्यामुळे लवकर यशस्वी झालो, असे डॉ. शेटे सांगतात.

परीक्षा काय प्रकारची आहे. हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला मी खासगी क्लास लावला होता. त्यानंतर मी पूर्णत: वैयक्तिक घरूनच अभ्यास केला. चार-पाच मित्रांचा आमचा चांगला ग्रुप केला होता. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही सातत्याने चर्चा करायचो. त्यामुळे अनेक अवघड विषय, संकल्पना (कन्सेप्ट) समजण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी गटचर्चा (ग्रुप स्टडी) अत्यंत फायदेशीर झाली आहे. एकएकट्याने अभ्यास करताना परीक्षेत काय विचारले जाते, काय वाचायला पाहिजे, यावरचा फोकस हलण्याची, बदलण्याची शक्यता बऱ्याच वेळा चुकत जाते. अनेक विद्यार्थी अनावश्यक असलेली पुस्तके वाचत बसतात. त्यात प्रचंड वेळ, वर्षे वाया जातात. त्यामुळे यूपीएससीच्या परीक्षेत नेमके काय विचारले जात आहे, हे समजणे आणि समजून घेणे फारच आवश्यक आहे.

डॉ. शेटे सांगतात, की पूर्व परीक्षा ही वैकल्पिक प्रकारची असल्याने त्यादृष्टीने नियमितपणे वर्तमानपत्र वाचन करत नोट्स काढणे आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात या नोट्सचा खूप फायदा होतो. मुख्य परीक्षेची मांडणी ही विश्लेषणात्मक असल्याने लेखन सराव फार गरजेचा आहे. मुलाखतीची तयारी करताना सुरुवातीला दोन-तीन क्लासमध्ये मी मुलाखत दिली होती. मात्र, मित्रांबरोबर गटचर्चा करताना सातत्याने मुलाखतीचा सराव केला. मित्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न काढायचे. प्रत्येक मुलाखतीच्या वेळी सराव करताना मित्र अनेक त्रुटी काढायचे. त्यावर मग मी जाणीवपूर्वक सुधारणा केल्या. त्याचा यूपीएससीच्या अंतिम परीक्षेच्या वेळी खूप फायदा झाला आहे.

फोटो : डॉ. मोतीलाल शेटे