शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:08 IST

निष्ठा, समर्पण असेल तरच होईल यूपीएससीचे शिखर सर अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) म्हणजे लांब पल्ल्याची, सहनशक्तीची दीर्घकाळ ...

निष्ठा, समर्पण असेल तरच होईल यूपीएससीचे शिखर सर

अभिजित कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) म्हणजे लांब पल्ल्याची, सहनशक्तीची दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यात यशस्वी व्हायचे असेल तर निष्ठा, समर्पण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सातत्याने रोज अभ्यास करणे आणि हळूहळू गती वाढवत न्यावी लागते. तरच यूपीएससीचे शिखर सर करता येते, असा मोलाचा सल्ला केवळ दुसऱ्याच प्रयत्नात देशात ५४ वा क्रमांक मिळवलेले आणि सध्या कर्नाटक राज्यातील टुमकुर जिल्ह्यातील टिपचूरचे सहायक आयुक्त म्हणून कार्यभार पाहणारे दिग्विजय बोडके देतात.

दिग्विजय बोडके हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे. परंतु, त्यांचे संपूर्ण शिक्षण ठाणे शहरात झाले. तर पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे. त्यांचे वडील हे आयएएस असून ते महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यामुळे दिग्विजय यांना प्रशासकीय सेवेचे बाळकडू आणि पाठिंबा घरातूनच मिळाला आहे. सुरुवातीला त्यांनी दिल्ली येथे यूपीएससीचे सहा महिने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण तयारी घरूनच केली. पहिल्या प्रयत्नात यूपीएससीत यशस्वी होत भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) पद मिळवले. तर महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. मात्र, सुरुवातीपासून आयएएस होण्याचा निर्धार केल्याने आयपीएस पद न स्वीकारता आयएएससाठी प्रयत्न सुरू केले. केवळ दुसऱ्याच प्रयत्नात २०१८ साली संपूर्ण देशात ५४ रँक मिळवत आयएएस पद मिळवले.

दिग्विजय बोडके सांगतात की, तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा किती गुणात्मक करता हे जास्त महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन घेत त्याप्रमाणे नियोजन आखून फोकस पद्धतीने, गुणात्मक अभ्यास यूपीएससी परीक्षेसाठी अत्यंत गरजेचा आहे.

National Council Educational Research Training म्हणजे NCERT ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके यूपीएससीसाठी महत्त्वाची असून तो पाया आहे. तसेच मी पूर्व आणि मुख्य परीक्षेत कोणताही फरक न करता दोन्ही परीक्षांचा एकत्रित अभ्यास केला. अडचणी आल्यावर संदर्भ साहित्य, पुस्तके, मार्गदर्शक आणि गुगल-यू-ट्यूब वरून तपासून घेतले. (सोशल मीडियाचा वापर गरजेपुरताच केला. इतर वेळेस सोशल मीडियापासून दूर राहिलो.)

---

एका-एका विषयाचे १००-१०० पेपर सोडवले

यूपीएससी परीक्षेत लेखन सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. बराच वेळा प्रश्नांची उत्तरे माहिती असून देखील लिहिताना वेळ पुरत नाही. त्यामुळे हातातील गुण मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने लेखन सरावाकडे गांभीर्याने पाहावे. मी स्वतः वैकल्पिक भूगोल विषयाचे दोन आणि सामान्य अध्ययनचे चार पेपर तसेच निबंध या प्रत्येकाचे १००-१०० पेपर मी सोडवले. अनेकांना हे अशक्य वाटते. पण मी सुरुवातीपासून सातत्याने सराव केला. त्यामुळे मला यश मिळाले.

----

‘प्लॅन-बी’चा प्रत्येकाने विचार करावा

सध्याच्या घडीला विचार केल्यास यूपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने ‘प्लॅन-बी’चा विचार करायला हवा. कारण यूपीएससी दर वर्षी केवळ १००० च्या आसपास जागा भरते. मात्र, त्यासाठी संपूर्ण देशभरातून १५-१६ लाख विद्यार्थी अर्ज भरतात. त्यामुळे प्रचंड स्पर्धा वाढली आहे. तसेच यापुढे ती आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने करिअरच्या दृष्टीने ‘प्लॅन-बी’चा विचार करणे आवश्यक आहे.