शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

थेट सरपंच निवडीने ग्रामविकासाला मिळणार चालना

By admin | Updated: July 4, 2017 03:35 IST

सरपंचांची निवड थेट जनतेतून होण्याचा निर्णय चांगला असून त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळेल अशी भावना जिल्ह्यातील विविध स्तरातील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सरपंचांची निवड थेट जनतेतून होण्याचा निर्णय चांगला असून त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळेल अशी भावना जिल्ह्यातील विविध स्तरातील राजकीय नेते, सरपंच-माजी सरपंच यांनी व्यक्त केली. नगराध्यक्षांप्रमाणेच सरपंचांचीही निवड आता थेट लोकांमधून होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाने आज या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. जिल्ह्याच्या राजकारणात पंचायत समितीमध्ये महत्त्वाचे पद असल्याने त्याभोवती राजकारण फिरत असते. अशा सरपंचपदासंबंधात निर्णय झाल्याने त्याचे पडसाद जिल्ह्यामध्येही उमटले. काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत झाले तर काही ठिकाणी या निर्णयावर टीकाही होत आहे. ‘लोकमत’ने जिल्ह्यातील प्रमुख तालुक्याच्या ठिकाणी व गावागावांमध्ये संपर्क साधून मतमतांतराचा कानोसा घेतला. शिरुर, खेड, बारामती, इंदापूर, जुन्नर, भोर, हवेली, दौंड आदी महत्त्वाच्या सर्व तालुक्यांमधून या महत्त्वाच्या निर्णयावर प्रतिक्रिया उमटल्या. बहुतेकांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार असून, नागरिकांना त्यांच्या अपेक्षित कार्यकर्त्याला सरपंच म्हणून थेट विराजमान करता येईल, अशी प्रतिक्रिया काही सरपंचांनी व्यक्त केली. सरपंचपदासाठी होणारे लॉबिंगदेखील आता थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवडणुकीसाठी असलेली ७ वी पासची अट ही जास्त असायला हवी होती अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सध्या सदस्य होण्यासाठी लाखो रुपये खर्च करून निवडून आल्यानंतर, सरपंच होण्यासाठी पुन्हा लॉबिंग करावे लागत आहे; पण आता सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने स्वच्छ चारित्र्याचा व विकासाचे ध्येय असणारा सरपंच होणार असल्याने गावच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. सरपंचाला आता विकासकामे करता येतील, असे मत डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे यांनी व्यक्त केले. सर्वसामान्य जनतेतून सरपंचपद निवडणे हा चांगला निर्णय आहे. निवडणुकीनंतर सदस्य पळवापळवी थांबून अर्थकारण संपून सामान्य जनतेतून सरपंच होईल. सर्वच निवडणुका या पद्धतीने झाल्यास सामान्य जनतेतून नेता तयार होईल. - अशोक पवार, माजी आमदार (शिरूर, हवेली)लोकमताने गावाने सरपंच निवडून दिलेल्या उमेदवाराने इतर सदस्यांच्या बहुमताने मताने गावच्या विकासकामांचे निर्णय घेणे बंधनकारक असावे. सरपंच पदाचा उमेदवार दहावी पास असल्यास गावचा विकास, नियोजन करता येईल. - कांचन शिंदे, मा. सरपंच, निघोजे गावात एकी राहील सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यापूर्वी फक्त गावात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच निवडीचा अधिकार होता. गावात दुफळी निर्माण व्हायची आता तसे होणार काही. तसेच फोडाफोडीचे राजकारण आणि घोडेबाजार न होता प्रत्यक्ष सरपंच निवडीचा अधिकार ग्रामस्थांना मिळणार आहे.- संतोष गार्डीमाजी सरपंच चिंचबाईवाडी, ता. खेड