शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

हल्ल्याच्या निषेधार्थ नारायणगाव शहरातून मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:08 IST

नारायणगाव शहरात प्रथमच अशा प्रकाराचा भरदिवसा हल्ला करण्यात आल्याने सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव शहरातून मूक ...

नारायणगाव शहरात प्रथमच अशा प्रकाराचा भरदिवसा हल्ला करण्यात आल्याने सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला, असा प्रकार पुन्हा होऊ नये आणि असा प्रकार घडला तर सर्व ग्रामस्थ एकत्र येतात, हा संदेश सर्वांना मिळावा यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे, सरपंच पाटे यांनी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्याशी चर्चा केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे याला अटक केली असून अन्य चार आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती दिल्यावर सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी तपासाबद्दल समाधान व्यक्त करून सर्व आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी केली . या गुन्ह्यात अधिक काही व्यक्ती सहभागी आहेत अशी माहिती पाटे यांनी दिली. या वेळी गुंड यांनी तपासात आणखीन आरोपी असेल तर त्यांचेवर कारवाई निश्चित होईल असे आश्वासन दिले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे, माजी सरपंच अशोक पाटे, सुजित खैरे, एकनाथ शेटे, आशिष माळवदकर, आरिफ आतार, संतोष पाटे, गणेश पाटे, संतोष दांगट, अजित वाजगे, विकास तोडकरी आदींसह सुमारे २०० ग्रामस्थ उपस्थित होते .

नारायणगावचे सरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगाव शहरातून नारायणगाव पोलीस ठाणे असा मूक मोर्चा काढण्यात आला .