शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मावळातील गुन्हेगारीविषयी मौन

By admin | Updated: June 2, 2017 02:06 IST

महाराष्ट्रातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रश्नावर येथे मौन

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : महाराष्ट्रातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रश्नावर येथे मौन बाळगले़ तसेच लोणावळा शहरातील विकासकामे वगळता मावळातील गुन्हेगारीविषयी ते काहीही बोलले नाहीत. लोणावळा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, माजी आमदार दिगंबर भेगडे, सभापती गुलाब म्हाळसकर, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके आदी उपस्थित होते.ज्या गतिमानतेने प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण केले. त्याच गतिने प्रशासन चालवून सामान्यांना मदत होईल, असे काम करा. लोणावळ्यास पर्यावरणपूरक शहर बनवा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, शहराचे घनकचरा विलगीकरणाचे प्रमाण ४० टक्के आहे. ते शंभर टक्के करत कचऱ्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करा. लोणावळा महाराष्ट्रतील पर्यटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असल्याने या शहराला पर्यावरणपूरक शहर बनवत पर्यटकांना चांगल्या सुविधा द्या. पाणीपुरवठा योजनेकरिता ३४ कोटी दिले आहेत. रुग्णालय, बहुमजली पार्किंग, तलाव, रोप वे आदींसाठी निधी कमी पडू देणार नाही. लोणावळ्यातील बांधकाम नियमावलीतील सहा मीटरची अडचण सोडविण्यासाठी लक्ष देऊ. पण, केवळ काँक्रीटची जंगले उभी राहून चालणार नाहीत. पर्यावरणपूरक शहरे पर्यटकांचे नंदनवन आहे. ते सौंदर्य न राहिल्यास पर्यटक दुसऱ्या जागा शोधतील. लोणावळा शहराला स्वच्छ व सुंदर बनवा. सरकार तुमच्या पाठीशी आहे. शहरे ही विकासाची इंजिने असल्याने गेल्या दोन वर्षात शहरांसाठी २१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रास्ताविक नगराध्यक्षा जाधव यांनी तर आभारप्रदर्शनउपनगराध्यक्ष पुजारी यांनी केले. मान्यवरांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.