शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मावळातील गुन्हेगारीविषयी मौन

By admin | Updated: June 2, 2017 02:06 IST

महाराष्ट्रातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रश्नावर येथे मौन

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : महाराष्ट्रातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रश्नावर येथे मौन बाळगले़ तसेच लोणावळा शहरातील विकासकामे वगळता मावळातील गुन्हेगारीविषयी ते काहीही बोलले नाहीत. लोणावळा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, माजी आमदार दिगंबर भेगडे, सभापती गुलाब म्हाळसकर, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके आदी उपस्थित होते.ज्या गतिमानतेने प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण केले. त्याच गतिने प्रशासन चालवून सामान्यांना मदत होईल, असे काम करा. लोणावळ्यास पर्यावरणपूरक शहर बनवा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, शहराचे घनकचरा विलगीकरणाचे प्रमाण ४० टक्के आहे. ते शंभर टक्के करत कचऱ्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करा. लोणावळा महाराष्ट्रतील पर्यटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असल्याने या शहराला पर्यावरणपूरक शहर बनवत पर्यटकांना चांगल्या सुविधा द्या. पाणीपुरवठा योजनेकरिता ३४ कोटी दिले आहेत. रुग्णालय, बहुमजली पार्किंग, तलाव, रोप वे आदींसाठी निधी कमी पडू देणार नाही. लोणावळ्यातील बांधकाम नियमावलीतील सहा मीटरची अडचण सोडविण्यासाठी लक्ष देऊ. पण, केवळ काँक्रीटची जंगले उभी राहून चालणार नाहीत. पर्यावरणपूरक शहरे पर्यटकांचे नंदनवन आहे. ते सौंदर्य न राहिल्यास पर्यटक दुसऱ्या जागा शोधतील. लोणावळा शहराला स्वच्छ व सुंदर बनवा. सरकार तुमच्या पाठीशी आहे. शहरे ही विकासाची इंजिने असल्याने गेल्या दोन वर्षात शहरांसाठी २१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रास्ताविक नगराध्यक्षा जाधव यांनी तर आभारप्रदर्शनउपनगराध्यक्ष पुजारी यांनी केले. मान्यवरांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.