शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जागेचा वाद उफाळण्याची चिन्हे

By admin | Updated: March 11, 2016 01:40 IST

वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांना डावलून महानगरपालिकेने बीआरटी नगर रस्ता थेट राज्य सरकारकडून जागा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे

आव्हाळवाडी : वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांना डावलून महानगरपालिकेने बीआरटी नगर रस्ता थेट राज्य सरकारकडून जागा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारांना विचारात न घेता ही एक प्रकारे मुस्कटदाबी आहे. त्यामुळे होणाऱ्या घटनेस महापालिका व राज्य शासन जबाबदार राहील, असा इशारा माजी जि. प. सदस्य व ग्रामपंचायत सदस्य रामदास दाभाडे यांनी दिला आहे.नगर रस्ता बीआरटी सुरू करण्यासाठी वाघोली केसनंद फाटा येथील साधारण अडीच एकर जागा महापालिकेने ग्रापंचायतीकडे मागणी केली होती. त्याबदल्यात ग्रामपंचायतीने काही अटी घातल्या होत्या. पण त्या मागण्या पुणे महापालिकेने डावलून त्यांना विचारात न घेता मुंबई येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेतला. पुणे महापालिकेने वाघोली ग्रामपंचायतीला डावलून राज्य शासनाकडून परवानगी घेतली आहे. त्यामुळे हा एक प्रकारे कुटील बेत असून, ग्रामस्थांचा विचार न घेतल्याने हा वाद उफाळला आहे. मनसे अध्यक्ष संदीप सातव यांनी विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. बीआरटीवरून वाघोली गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे. सरकारच्या मालकीची त्याच परिसरात दुसरी एक जागा आहे, ती महापालिकेला देण्याचे निर्णय घेतला असला, तरी पण कोणती जागा, त्याचा गट नंबर कोणता, अजून दुसरीकडे आहे का? यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे, की महापालिका सर्व जागा घेत आहे का? यामुळे ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते विचारात पडले आहेत. हा वाघोली ग्रामपंचायतीचा अपमानसरपंच संजीवनी वाघमारे यांनी सांगितले, की पालकमंत्र्यांशी बीआरटीविषयी एक ते दीड महिन्यापूर्वी, आम्ही ग्रामपंचायत सदस्य चर्चा करण्यासाठी गेलो असता, ते उपस्थित नव्हते. त्यांनी फोनवर सांगितले, की याविषयी बैठक बोलावून चर्चा करू. जागा शासनाची असली तरी वाघोली ग्रामपंचायतीचा हा अपमान आहे. आम्ही तातडीने ग्रामसभा बोलावून त्यामध्ये जो निर्णय होईल, तो करू.