शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

संतप्त शेतकऱ्यांचा अधिकाऱ्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:20 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज

यवत : दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे विभागाच्या यवत उपविभागीय कार्यालयात जाऊन शाखा अधिकाऱ्याला घेराव घातला. या वेळी संतप्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शाखा अभियंत्यांची चांगलीच भंबेरी उडाली.यंदा पाऊसच झालेला नसल्याने खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा कमी आहे. उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. यामुळे दौंड तालुक्यातील शेती पाण्याअभावी अडचणीत आली आहे. त्यातच शासनाने जुन्या कालव्यातून (बेबी कॅनॉल) नदीतील पाणी शुद्धीकरण करून सोडले जाणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतीसाठी आवर्तन मिळू शकेल, असे सागितले होते. मात्र, कॅनॉलचे काम न झाल्याने पाणी सोडण्यास उशीर झाला. पाणी सोडण्यासाठी गळती बंद होऊन कामे पूर्ण होण्याची आवश्यकता आहे, असे कारण पाटबंधारे विभागातील अधिकारी शेतकऱ्यांना देत होते. मात्र, आता कामे पूर्ण झाली तरी पाणी येत नाही. अखेर आज संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढून याचा जाब विचारला. या वेळी पाटबंधारेचे शाखा अभियंता काळे, भाजपाचे तानाजी दिवेकर, भाजपाचे दौंड तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, दौंड तालुका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव गायकवाड, दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरविंद दोरगे, बाबा शेळके, किसन दोरगे, राहुल अवचट व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)तीन दिवसांत पाणी पोहोचेल...शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहता, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता काळे यांनी तीन दिवसांत दौंड तालुक्यात जुन्या कालव्याचे पाणी पोहोचेल, असे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. अखेर तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर तीन दिवसांत पाणी न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी दिला.कामे पूर्णत्वास जात असताना आता नवीनच समस्या उभी राहिली असून, त्यासाठी पाटबधारे विभाग पाण्याचे योग्य नियोजन करीत नसल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी आज थेट पाटबंधारे विभागाच्या यवत कार्यालयात मोर्चा आणला.