शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

संतप्त शेतकऱ्यांचा अधिकाऱ्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:20 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज

यवत : दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे विभागाच्या यवत उपविभागीय कार्यालयात जाऊन शाखा अधिकाऱ्याला घेराव घातला. या वेळी संतप्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शाखा अभियंत्यांची चांगलीच भंबेरी उडाली.यंदा पाऊसच झालेला नसल्याने खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा कमी आहे. उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. यामुळे दौंड तालुक्यातील शेती पाण्याअभावी अडचणीत आली आहे. त्यातच शासनाने जुन्या कालव्यातून (बेबी कॅनॉल) नदीतील पाणी शुद्धीकरण करून सोडले जाणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतीसाठी आवर्तन मिळू शकेल, असे सागितले होते. मात्र, कॅनॉलचे काम न झाल्याने पाणी सोडण्यास उशीर झाला. पाणी सोडण्यासाठी गळती बंद होऊन कामे पूर्ण होण्याची आवश्यकता आहे, असे कारण पाटबंधारे विभागातील अधिकारी शेतकऱ्यांना देत होते. मात्र, आता कामे पूर्ण झाली तरी पाणी येत नाही. अखेर आज संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढून याचा जाब विचारला. या वेळी पाटबंधारेचे शाखा अभियंता काळे, भाजपाचे तानाजी दिवेकर, भाजपाचे दौंड तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, दौंड तालुका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव गायकवाड, दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरविंद दोरगे, बाबा शेळके, किसन दोरगे, राहुल अवचट व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)तीन दिवसांत पाणी पोहोचेल...शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहता, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता काळे यांनी तीन दिवसांत दौंड तालुक्यात जुन्या कालव्याचे पाणी पोहोचेल, असे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. अखेर तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर तीन दिवसांत पाणी न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी दिला.कामे पूर्णत्वास जात असताना आता नवीनच समस्या उभी राहिली असून, त्यासाठी पाटबधारे विभाग पाण्याचे योग्य नियोजन करीत नसल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी आज थेट पाटबंधारे विभागाच्या यवत कार्यालयात मोर्चा आणला.