शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांचा अधिकाऱ्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:20 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज

यवत : दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे विभागाच्या यवत उपविभागीय कार्यालयात जाऊन शाखा अधिकाऱ्याला घेराव घातला. या वेळी संतप्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शाखा अभियंत्यांची चांगलीच भंबेरी उडाली.यंदा पाऊसच झालेला नसल्याने खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा कमी आहे. उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. यामुळे दौंड तालुक्यातील शेती पाण्याअभावी अडचणीत आली आहे. त्यातच शासनाने जुन्या कालव्यातून (बेबी कॅनॉल) नदीतील पाणी शुद्धीकरण करून सोडले जाणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतीसाठी आवर्तन मिळू शकेल, असे सागितले होते. मात्र, कॅनॉलचे काम न झाल्याने पाणी सोडण्यास उशीर झाला. पाणी सोडण्यासाठी गळती बंद होऊन कामे पूर्ण होण्याची आवश्यकता आहे, असे कारण पाटबंधारे विभागातील अधिकारी शेतकऱ्यांना देत होते. मात्र, आता कामे पूर्ण झाली तरी पाणी येत नाही. अखेर आज संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढून याचा जाब विचारला. या वेळी पाटबंधारेचे शाखा अभियंता काळे, भाजपाचे तानाजी दिवेकर, भाजपाचे दौंड तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, दौंड तालुका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव गायकवाड, दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरविंद दोरगे, बाबा शेळके, किसन दोरगे, राहुल अवचट व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)तीन दिवसांत पाणी पोहोचेल...शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहता, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता काळे यांनी तीन दिवसांत दौंड तालुक्यात जुन्या कालव्याचे पाणी पोहोचेल, असे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. अखेर तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर तीन दिवसांत पाणी न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी दिला.कामे पूर्णत्वास जात असताना आता नवीनच समस्या उभी राहिली असून, त्यासाठी पाटबधारे विभाग पाण्याचे योग्य नियोजन करीत नसल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी आज थेट पाटबंधारे विभागाच्या यवत कार्यालयात मोर्चा आणला.