शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

शिक्र्रापूरचा टोल बंद करा

By admin | Updated: February 24, 2015 23:07 IST

शिक्रापूर-चाकण टोल नाका बंद करण्यासाठीचे आंदोलन येत्या दोन दिवसांत तीव्र केले जाईल. प्रसंगी गनिमी कावा वापरून आंदोलकांच्या

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण टोल नाका बंद करण्यासाठीचे आंदोलन येत्या दोन दिवसांत तीव्र केले जाईल. प्रसंगी गनिमी कावा वापरून आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा ठाम निर्धार बंडातात्या कराडकर यांनी शिक्रापूर येथे व्यक्त केला. गेली सहा महिने चाकण-शिक्रापूर रोडवरील टोलनाका बंद करण्यासाठी स्थानिक शिक्रापूर ग्रामस्थांबरोबरच क्रांतिवीर प्रतिष्ठान, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, किसान संघ, भारत स्वाभिमान न्यास व टोलविरोधी कृती समिती शिक्रापूर यांनी वेळोवेळी मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता.आजपासून (दि.२४) या टोलनाक्यावर आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या वेळी बंडातात्या कराडकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. या वेळी संजय पाचंगे, रमेश टाकळकर, डॉ. धनंजय खेडकर, शिक्रापूरचे सरपंच संजय जगताप, रामभाऊ सासवडे, अंकुश घारे, ज्ञानेश्वर खेडकर, अमोल बैलभर, सचिन जाधव तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्रापूर ग्रामस्थ व विविध संघटनांनी सुरू केलेल्या गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलनाने हा प्रश्न मिटत नसेल तर वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करून या टोलनाक्याला कुलूप ठोकल्यावरच आंदोलन मागे घेण्याचा निर्णय या वेळी आंदोलकांनी घेतला. या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. टोल न भरण्याचे आंदोलन सुरू करणार असल्याचे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी या वेळी सांगितले. आज सकाळी सात वाजेपासून टोल नाक्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची गणती आंदोलकांनी सुरू केली. या वेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले व मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)