शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

श्रीपाल सबनीसांचे वक्तव्य खेदजनक

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

एक अमराठी भाषा ज्ञानभाषा असल्याची भलावण करणारी अनावश्यक आणि अनुचित टिप्पणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.

पुणे : एक अमराठी भाषा ज्ञानभाषा असल्याची भलावण करणारी अनावश्यक आणि अनुचित टिप्पणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. सबनीसांच्या वक्तव्याचा खेद वाटत असून त्यांनी या पुढे जबाबदारीचे भान राखून औचित्य सांभाळावे, असे आवाहन मराठी राष्ट्रभाषा समितीचे अध्यक्ष, मराठी माध्यम संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष अनिल गोरे यांनी केले आहे.पिंपरी येथे होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सबनीस यांची निवड झाली आहे. याचे भान राखून त्यांनी मराठी या आपल्या सध्याच्या तात्पुरत्या पदाशी संबंधित भाषेबाबत विचार सातत्याने प्रदर्शित करावेत आणि अन्य कोणत्या भाषा ज्ञानभाषा आहेत, याची उठाठेव या पदावरून उतरल्यावर करावी. ही अपेक्षा वैयक्तिक पातळीवर नसून पदाशी संबंधित औचित्याचे भान बाळगावे, असे मत गोरे यांनी व्यक्त केले आहे. मराठीच्या परिघातील कार्यक्रम आणि उपक्रमांच्या प्रसंगी अन्य अमराठी भाषेचे गोडवे गाण्याचा उपक्रम सबनीस यांच्याप्रमाणेच अन्य अनेक मराठी साहित्यिकांनी मराठीचा प्रसार, प्रचाराशी संबंधित मोठे पद मिळाल्यावर यापूर्वीही केला आहे. जगातील अन्य कोणत्याही भाषिक संस्थांचे, संमेलनाचे पदाधिकारी अशी अन्य भाषांची उठाठेव त्या पदावरून करीत नाहीत, असा अनुभव असल्याचे नमूद करून गोरे यांनी म्हटले आहे, की मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी संबंधित संस्थेत, उपक्रमात मोठे पद मिळाल्यावर अकारण अन्य भाषेचे गोडवे गाणे हे मराठीच्या विकासाला मारक आहे. सबनीस यांनी अशी घातक प्रथा थांबवावी, असे मित्र म्हणून आवाहन करीत आहे.