शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शाळा, महाविद्यालयांतील अग्निशामक यंत्रणा ‘शो पीस’

By admin | Updated: December 26, 2016 03:18 IST

शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशामक यंत्रणेचा केवळ शो-पीस म्हणूनच वापर केला असल्याचे दिसून येत आहे.

हिंजवडी : शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशामक यंत्रणेचा केवळ शो-पीस म्हणूनच वापर केला असल्याचे दिसून येत आहे. मुदत संपल्यानंतरही अग्निशामक यंत्रात ‘गॅस रीफिलिंग’ केलेला आढळला नाही. सहा-सहा महिने उलटूनही या यंत्रणेची तपासणी अनेक ठिकाणच्या शाळा व महाविद्यालयांत झालेली नाही. अनेक शाळांत ही यंत्रणा अडगळीत असून, ती सहजपणे हाताळता येईल अशी व्यवस्थाही आढळून आली नाही. शहर आणि ग्रामीण परिसरातील काही मोजक्या शाळा आणि महाविद्यालय सोडले, तर बहुतांश शाळेत यंत्रणाच उपलब्ध नाही. रीफिलिंगकडे दुर्लक्ष शहरातील व ग्रामीण भागातील १५ शाळा, महाविद्यालयांची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली असता, ७ शाळांतील अग्निशामक यंत्रातील गॅस कालबाह्य आढळला. त्यात महापालिकेच्या १, जिल्हा परिषदेची एक, तर खासगीच्या पाच शाळांचा समावेश आहे. दोन महाविद्यालये व चार शाळांमधील यंत्रामध्ये मुदतीच्या आत गॅस रिफिलिंग झालेले आहे.कामचलाऊ प्रशिक्षण अग्निशामक यंत्रणेसंदर्भात संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्रशासन, तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीदेखील सतर्कता बाळगत नाहीत. अनेक शाळांमध्ये तर या यंत्राचा वापर बंधनकारक आहे हेदेखील माहीत नाही. या यंत्राची देखभाल, हाताळणीबाबतही कोणालाच शास्त्रशुद्ध ज्ञान नाही. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार केवळ कागदावरच आपत्कालीन व्यवस्थापन समिती आहे. प्रत्यक्षात यामध्ये समाविष्ट असणाऱ्या काही सदस्यांनासुद्धा याबाबत पूर्ण माहिती नाही अथवा प्रशिक्षणसुद्धा दिले गेले नाही. केवळ औपचारिकता नको अग्निशामक यंत्रणा शाळा-महाविद्यालयात केवळ औपचारिकता न राहता संबंधित शाळा-महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व यंत्रणा हाताळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला वापरासंबंधी पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. या यंत्रणेकडे वेळोवेळी शालेय प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.(वार्ताहर)यंत्राची तपासणीच नाही सहा महिन्यांनंतरही यंत्राची तपासणीच केली जात नाही. गॅसची वर्षभराची एक्स्पायरी डेट असते. एका वर्षाने गॅस बदलणे आवश्यक आहे; परंतु अनेक ठिकाणी चार-पाच वर्षांनी अधिकाऱ्यांनी विचारणा केली, तरच संबंधित प्रशासनास जाग येते. आॅडिटमध्ये त्रुटी निघू शकते. या यंत्रावर रीफिलिग डेट (पुनर्भरण) व ड्यू डेटचे (एक्स्पायरी डेट) स्टिकर असते; पण असे स्टिकर यंत्रावर आढळले; परंतु त्यावरील मजकूर काहीच दिसत नाही, हे विशेष! देखभालीबाबत निष्काळजीपणा झाल्यास स्फोट होण्याची शक्यता अधिक असते.यंत्र हाताळणीबाबत माहितीच नाही४अग्निशामक यंत्र भिंतीला वर्षानुवर्षे लावलेले असते; परंतु संकटसमयी ते हाताळायचे कसे याची माहिती कोणालाही नसल्याची धक्कादायक माहिती अनेक शाळांमध्ये आढळली. हाताळणीसंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. प्रत्येक शाळेत हे यंत्र जणू ‘शो पीस’ ठरले आहेत.अनुदान नसल्याचे कारणखासगी संस्थांची बहुसंख्य शाळा-महाविद्यालयांनी अनुदानच नसल्याचे कारण पुढे करत अग्निशामक यंत्रणेला बगल दिली आहे. अनुदान नसल्याने अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येतात, अशी कारणे अनेक संस्थाचालक, प्रशासनाने पुढे केली आहेत.