शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

गिर्यारोहण शिक्षण ॲकॅडेमिक हवे की प्रॅक्टिकल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST

अभिजित कोळपे पुणे विद्यापीठात नुकताच गिर्यारोहण डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे. पुणे शहर हे जसे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ...

अभिजित कोळपे

पुणे विद्यापीठात नुकताच गिर्यारोहण डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे. पुणे शहर हे जसे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तसेच, आता गिर्यारोहणाचे केंद्रस्थान बनत आहे. प्रशिक्षित आणि कुशल गिर्यारोहक हे सर्वाधिक पुणे शहरात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. गिर्यारोहण आणि साहसी खेळामध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, गिर्यारोहण शिक्षण अथवा प्रशिक्षण हे केवळ ऑनलाइन पद्धतीने देता येणे शक्य नाही. ते केवळ आणि केवळ प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन प्रात्यक्षिक केले तरच त्या क्षेत्राचा विकास होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते.

गिर्यारोहण या विषयातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे यासाठी हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. मात्र, ॲकॅडेमिक पेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर प्रात्यक्षिक दिल्यास ते अधिक लाभदायक होईल आणि या क्षेत्राच्या वाढीसाठी फायद्याचे होईल, असे तज्ज्ञांना वाटते. केवळ ऑनलाइन शिक्षण दिल्यास त्याचे गांभीर्य कमी होईल. अनेकजण केवळ डिप्लोमा प्रमाणपत्र मिळतेय म्हणून याकडे पाहून प्रवेश घेतील.

किती गड, किल्ल्यांवर प्रशिक्षण देता येईल हे तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम पुणे जिल्हा, महाराष्ट्र आणि त्यानंतर देशपातळीवर असे किती स्पॉट, ठिकाणे आहेत. जेथे गिर्यारोहण करता येईल याची माहिती उपलब्ध लोकांना करून द्यावी. त्यानंतर ऑनलाइन शिक्षणाबरोबर प्रात्यक्षिक देता येईल यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.

गिर्यारोहण उपक्रमात आपण येणाऱ्या काळात किती तरुणाईला यात सामावून घेणार आहोत. त्यासाठी प्रत्यक्ष कोणत्या प्रकारचे उपक्रम हाती घेता येईल. त्यात प्रामुख्याने गावोगावी कॅम्प आयोजित करणे, गाव, तालुका, शहर आणि जिल्हा पातळीवर कार्यशाळा आयोजित करणे हे प्रामुख्याने करावे लागेल.

गिर्यारोहण वाढवण्यासाठी तरुणाईला कॉलेज, विद्यापीठात बोलावण्याऐवजी प्रत्यक्ष फिल्डवर प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. तरच या क्षेत्राचा विकास होऊ शकतो. अन्यथा पुणे शहरच नाही तर राज्य आणि देशात केवळ प्रमाणपत्र देण्यासाठी अनेक कॉलेज, विद्यापीठ सुरू होतील. आणि त्यातून भरमसाठ शुल्क आकारून त्याला केवळ व्यावसायिक स्वरूप येण्याची शक्यता आहे. ते टाळायचे असेल तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यावर भर असायला हवा, असे या क्षेत्रात मागील कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या जाणकार, तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.