शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

तब्येत बिघडल्यास ब्यूटीपार्लरमध्ये नेणार की रूग्णालयात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

पुणे : ‘माझ्या आईचे वय झाले आहे, तर तिला आपण कुठे घेणार जाणार ? ब्यूटीपार्लर की रूग्णालयात ? ?’ ...

पुणे : ‘माझ्या आईचे वय झाले आहे, तर तिला आपण कुठे घेणार जाणार ? ब्यूटीपार्लर की रूग्णालयात ? ?’ या प्रश्नावर उत्तर आले अर्थातच रूग्णालयात ! मग मुठा नदीच्या सौंदर्यकीकरणासाठी कशाला हजारो कोटींचा खर्च केला जात आहे ? असा सवाल ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवडकर यांनी महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांना विचारला. त्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. यावरूनच नदी सुधार योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सजग नागरिक मंच मासिक सभेतंर्गत रविवारी ‘महापालिकेच्या नदी सुधार’ योजनेवर ऑनलाइन कार्यक्रम आयोजिला होता. त्यामध्ये पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमारच केला.

या वेळी मंचाचे विवेक वेलणकर, जुगल राठी, सारंग यादवडकर, जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, मनीष घोरपडे, गुरूदास नूलकर आदी नदी अभ्यासक सहभागी झाले होते.

दिघे यांनी नदी पात्रालगतचा कचरा काढून सर्वत्र सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यात जीवंत झऱ्याचा विचार केल्याचे सांगितले. नदी पात्रात सांडपाणी येत असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ते नदीपात्रालगतच असतील. तसेच नदीकाठी जे स्थानिक वृक्ष आहेत, त्यांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे पक्ष्यांनाही अन्न मिळू शकेल, असे दिघे यांनी सांगितले.

————————-

पुणेकरांचा पैसा खर्च होणार

नदी सुधार प्रकल्पाचे एकूण बजेट २६१९ कोटी रूपये आहे. हा निधी स्वयंसेवी संस्था आणि महापालिका बजेटमधून उभा करणार आहे. याचाच अर्थ पुणेकरांचा पैसा यात खर्ची होणार आहे, असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला.

————————-

अंडी कुठे उबवणार ते तज्ज्ञ पाहतील ?

नदीकाठी पाणथळ जागा असते, तिथे अनेक पक्षी आपले अंडी उबवतात. नदीकाठचे सिमेंटीकरण केल्यावर पाणथळ जागा नष्ट होईल. त्यामुळे पक्षी अंडी कुठे उबवणार ? असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला. त्यावर दिघे म्हणाले,‘‘ पक्षी अंडी कुठे उबवणार, ते तज्ज्ञ पाहून घेतील.’’

——————————

पूराचा पुणेकरांना फटका बसणार

सारंग यादवडकर यांनी ‘टेरी’ संस्थेने पुण्यातील पावसाबाबतच्या एका रिपोर्टवर लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, शासनासाठी ‘टेरी’ संस्थेने पुण्यातील भविष्यातील पावसाचा अंदाज दिला आहे. त्यात सुमारे ३७.५ टक्के पाऊस अधिक होणार असल्याचे नमूद केले आहे. या अहवालाचा विचार केला आहे का ? असे दिघे यांना विचारले असता ते नाही बोलले. याचाच अर्थ नदीकाठ बांधल्यानंतर पूर आला तर त्याचा फटका पुणेकरांना बसू शकतो.

————