शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

तब्येत बिघडल्यास ब्यूटीपार्लरमध्ये नेणार की रूग्णालयात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

पुणे : ‘माझ्या आईचे वय झाले आहे, तर तिला आपण कुठे घेणार जाणार ? ब्यूटीपार्लर की रूग्णालयात ? ?’ ...

पुणे : ‘माझ्या आईचे वय झाले आहे, तर तिला आपण कुठे घेणार जाणार ? ब्यूटीपार्लर की रूग्णालयात ? ?’ या प्रश्नावर उत्तर आले अर्थातच रूग्णालयात ! मग मुठा नदीच्या सौंदर्यकीकरणासाठी कशाला हजारो कोटींचा खर्च केला जात आहे ? असा सवाल ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवडकर यांनी महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांना विचारला. त्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. यावरूनच नदी सुधार योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सजग नागरिक मंच मासिक सभेतंर्गत रविवारी ‘महापालिकेच्या नदी सुधार’ योजनेवर ऑनलाइन कार्यक्रम आयोजिला होता. त्यामध्ये पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमारच केला.

या वेळी मंचाचे विवेक वेलणकर, जुगल राठी, सारंग यादवडकर, जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, मनीष घोरपडे, गुरूदास नूलकर आदी नदी अभ्यासक सहभागी झाले होते.

दिघे यांनी नदी पात्रालगतचा कचरा काढून सर्वत्र सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यात जीवंत झऱ्याचा विचार केल्याचे सांगितले. नदी पात्रात सांडपाणी येत असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ते नदीपात्रालगतच असतील. तसेच नदीकाठी जे स्थानिक वृक्ष आहेत, त्यांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे पक्ष्यांनाही अन्न मिळू शकेल, असे दिघे यांनी सांगितले.

————————-

पुणेकरांचा पैसा खर्च होणार

नदी सुधार प्रकल्पाचे एकूण बजेट २६१९ कोटी रूपये आहे. हा निधी स्वयंसेवी संस्था आणि महापालिका बजेटमधून उभा करणार आहे. याचाच अर्थ पुणेकरांचा पैसा यात खर्ची होणार आहे, असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला.

————————-

अंडी कुठे उबवणार ते तज्ज्ञ पाहतील ?

नदीकाठी पाणथळ जागा असते, तिथे अनेक पक्षी आपले अंडी उबवतात. नदीकाठचे सिमेंटीकरण केल्यावर पाणथळ जागा नष्ट होईल. त्यामुळे पक्षी अंडी कुठे उबवणार ? असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला. त्यावर दिघे म्हणाले,‘‘ पक्षी अंडी कुठे उबवणार, ते तज्ज्ञ पाहून घेतील.’’

——————————

पूराचा पुणेकरांना फटका बसणार

सारंग यादवडकर यांनी ‘टेरी’ संस्थेने पुण्यातील पावसाबाबतच्या एका रिपोर्टवर लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, शासनासाठी ‘टेरी’ संस्थेने पुण्यातील भविष्यातील पावसाचा अंदाज दिला आहे. त्यात सुमारे ३७.५ टक्के पाऊस अधिक होणार असल्याचे नमूद केले आहे. या अहवालाचा विचार केला आहे का ? असे दिघे यांना विचारले असता ते नाही बोलले. याचाच अर्थ नदीकाठ बांधल्यानंतर पूर आला तर त्याचा फटका पुणेकरांना बसू शकतो.

————