शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात नव्या नोटांचा तुटवडा

By admin | Updated: November 13, 2016 04:29 IST

शहरातील बहुतांश एटीएम केंद्र बंद. सुरू असलेल्या एटीएम बाहेर लागलेल्या रांगा...अनेक एटीएम केंद्रात पैसे असूनही तांत्रिक अडचणीने यंत्रातून रक्कम न मिळणे...अनेक एटीएममध्ये

पुणे : शहरातील बहुतांश एटीएम केंद्र बंद. सुरू असलेल्या एटीएम बाहेर लागलेल्या रांगा...अनेक एटीएम केंद्रात पैसे असूनही तांत्रिक अडचणीने यंत्रातून रक्कम न मिळणे...अनेक एटीएममध्ये पैसे संपल्याचे दिसून येणे....बँकांतून ठरविल्यापेक्षी कमी रकमेचे वाटप करणे...अशा प्रचंड गोंधळ व नियोजनाच्या अभावामुळे शनिवारी नागरिकांनी चलनाची आणीबाणी अनुभवली. एटीएम केंद्रातून पैसे काढण्याच्या दुसऱ्याच दिवशी व्यवस्था कोलमडून पडली. शुक्रवारी देखील बहुतांश राष्ट्रीयीकृत, खासगी व इतर बँकांची एटीएम बंदच होती. जी एटीएम सुरू होती, त्यातील रक्कमही सकाळी लवकरच संपली असल्याचे चित्र होते. शहर व उपनगरांतील काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएमबाहेर व बँकांबाहेर गर्दी कायम होती. हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी अथवा भरण्यासाठी विविध बँकांच्या शाखांमध्ये गर्दी कायम होती. एटीएममधून नव्या चलनी नोटा पुरविण्यासाठी शुक्रवारपासूनच एटीएम केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणे गरजेचे होते; मात्र शनिवारीदेखील शहरातील संपूर्ण एटीएम केंद्र सुरू करण्यातच बँकांना अपयश आले. एसबीआय, बँक आॅफ इंडिया, आयडीबीआय, बँक आॅफ महाराष्ट्रा, एचडीएफसी, भगिनी निवेदिता, आयसीआयसीआय, जनता सहकारी बँक, अशा सर्वच प्रकारच्या बँकांना आपली एटीएम केंदे्र संपूर्ण क्षमेतेने सुरू ठेवणे अशक्य झाले. काही एटीएम केंद्रात पुरेसे पैसे असूनही पैसे येत नव्हते. तेथील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन नोटा जाडीला कमी असल्याने यंत्राकडून त्या बाहेर येण्यात अडथळा निर्माण होत आहे. अशा तांत्रिक अडचणींमुळेदेखील अनेक एटीएम केंद्रे कुचकामी ठरली. रांगेत उभे राहून पदरी निराशाच1लोकांची मागणी अधिक असल्याने एटीएम केंद्रातील रक्कमदेखील काही वेळातच संपत होती. अशी यंत्रात पुन्हा रक्कम भरण्याची तरतूद बँकांकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे ज्या एटीएम केंद्रावर पैसे उपलब्ध होते, तेथे रस्त्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. इतकेच काय, तर लोक चक्क रस्त्यावर बसून आपला क्रमांक येण्याची वाट पाहत असल्याचे देखील काही ठिकाणी दिसून आले.2अनेक बँकांमध्येदेखील रकमेच्या तुटवड्याअभावी कमी रक्कम बदलून देण्यात येत होती. प्रत्येक व्यक्तीला चार हजार रुपयांच्या नव्या नोटा बदलून देण्याची सुविधा देण्यात आली आहे; मात्र अनेक बँकांत पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कमच बदलून दिली जात होती. त्यामुळे खूप वेळ रांगेत राहूनही नागरिकांच्या पदरात निराशाच पडली.