शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाझरे जलाशय होणार चकाचक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:23 IST

येथील नाझरे स्वच्छता मोहिमेला कडेपठार पतसंस्थेच्या वतीने गुरुवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेमुळे जलाशय चकाचक होणार आहे. सुमारे दोन ते तीन तासांच्या श्रमदानातून पहिल्याच दिवशी सहा ट्रॉली निर्माल्य, विसर्जित केलेले कपडे तसेच प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला.

जेजुरी : येथील नाझरे स्वच्छता मोहिमेला कडेपठार पतसंस्थेच्या वतीने गुरुवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेमुळे जलाशय चकाचक होणार आहे. सुमारे दोन ते तीन तासांच्या श्रमदानातून पहिल्याच दिवशी सहा ट्रॉली निर्माल्य, विसर्जित केलेले कपडे तसेच प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला.या स्वच्छता मोहिमेत कडेपठार पतसंस्थेचे अध्यक्ष माणिकराव झेंडे-पाटील, सचिव अरविंद शेंडकर, संचालक संपत कोळेकर, रोहिदास कुदळे, रामचंद्र माळवदकर, इंदू फार्माचे संचालक तथा जिमाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, उद्योजक पांडुरंग सोनवणे, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक शांताराम कापरे, जेजुरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एन. डी. जगताप, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, लवथळेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश लेंडे, गणेश डोंबे, पाटबंधारे शाखा अभियंता एस. एन. चवलंग, वरिष्ठ लिपिक विश्वास पवार, कडेपठार पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी, शहरातील पत्रकार व परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असला, तरी कोरड्या पडलेल्या जलाशयात प्रचंड अस्वच्छता असून त्यांची साफसफाई करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे स्वच्छता मोहिमेला गुरुवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. ही मोहीम पूर्ण जलाशय स्वच्छ होत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्यात येईल. शनिवारी (दि. १२) शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय जिजामाता विद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कूल, इंदू इंग्लिश स्कूल, दादा जाधवराव विद्यालय आदी विद्यालयांमधील विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. या वेळी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य, कचरा गोळा होणार आहे. यात सहभागी होणाºया विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था कडेपठार मेडिकल फाउंडेशन कडेपठार पतसंस्थेकडून करण्यात येईल, अशी माहिती माणिकराव झेंडे-पाटील यांनी दिली.जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात असणारे व्यावसायिक हटवण्याची येथील शेतकºयांची मागणी असून जलाशयावर स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या अनेक शेतकºयांनी पाटबंधारे अधिकाºयांना पाणलोट क्षेत्रात धार्मिक विधीची दुकाने थाटलेल्या व्यावसायिकांची दुकाने हटवावीत, भाविकांची वाहने धरणात येण्यापासून मज्जाव करावा अशा मागण्या केल्या आहेत.पाणलोट क्षेत्रात अनेक व्यावसायिक दुकाने थाटतात, भाविकांची वाहने येतात वाहने-कपडे धुणे, स्नानविधीमुळे येथील पाणी दूषित झाले होते. हे पाणी सुमारे ५० गावांना पिण्यासाठी पुरविले जाते. त्यामुळे पुढील काळात जलाशय प्रदूषित होणार नाही, याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी उपस्थितांनी अधिकाºयांकडे केली असून त्याबाबत पाटबंधारे विभागाकडून पोलीस ठाण्याला पत्र देण्यात येणार आहे, असे सांगण्यात येते.साठा कमी असतानाही उपसानाझरे (मल्हारसागर) जलाशय कोरडा पडलेला आहे. सध्या जलाशयात दुर्गंधी सुटलेला व पिण्यालायक नसलेला गाळमिश्रित पाणीसाठा आहे. असे असतानाही जेजुरी नगरपालिका व इंडियन सीमलेस कंपनी पाणी उचलत असल्याचे निदर्शनाला आले. ही बाब अधिकाºयांच्या निदर्शनाला आणून देताच सीमलेस कंपनीच्या जबाबदार अधिकाºयांना पाणी उचलण्याचे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.पाणी उचलणे बंद कराप्रभारी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांना अपाय होणारे पाणी उचलणे बंद करावे, असे सांगण्यात आले. नगरपालिका गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक योगेश जगताप यांनी जलाशयावर जाऊन पाहणी केली आणि पाणीउपसा करणाºया वीज मोटारी कामगारांमार्फत बंद केल्या. मोरगाव, नाझरे व इतर गावांच्या पिण्याच्या पाणी योजना १ आॅगस्टपासून बंद करण्यात आल्या आहेत.