शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नाझरे जलाशय होणार चकाचक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:23 IST

येथील नाझरे स्वच्छता मोहिमेला कडेपठार पतसंस्थेच्या वतीने गुरुवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेमुळे जलाशय चकाचक होणार आहे. सुमारे दोन ते तीन तासांच्या श्रमदानातून पहिल्याच दिवशी सहा ट्रॉली निर्माल्य, विसर्जित केलेले कपडे तसेच प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला.

जेजुरी : येथील नाझरे स्वच्छता मोहिमेला कडेपठार पतसंस्थेच्या वतीने गुरुवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेमुळे जलाशय चकाचक होणार आहे. सुमारे दोन ते तीन तासांच्या श्रमदानातून पहिल्याच दिवशी सहा ट्रॉली निर्माल्य, विसर्जित केलेले कपडे तसेच प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला.या स्वच्छता मोहिमेत कडेपठार पतसंस्थेचे अध्यक्ष माणिकराव झेंडे-पाटील, सचिव अरविंद शेंडकर, संचालक संपत कोळेकर, रोहिदास कुदळे, रामचंद्र माळवदकर, इंदू फार्माचे संचालक तथा जिमाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, उद्योजक पांडुरंग सोनवणे, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक शांताराम कापरे, जेजुरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एन. डी. जगताप, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, लवथळेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश लेंडे, गणेश डोंबे, पाटबंधारे शाखा अभियंता एस. एन. चवलंग, वरिष्ठ लिपिक विश्वास पवार, कडेपठार पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी, शहरातील पत्रकार व परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असला, तरी कोरड्या पडलेल्या जलाशयात प्रचंड अस्वच्छता असून त्यांची साफसफाई करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे स्वच्छता मोहिमेला गुरुवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. ही मोहीम पूर्ण जलाशय स्वच्छ होत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्यात येईल. शनिवारी (दि. १२) शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय जिजामाता विद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कूल, इंदू इंग्लिश स्कूल, दादा जाधवराव विद्यालय आदी विद्यालयांमधील विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. या वेळी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य, कचरा गोळा होणार आहे. यात सहभागी होणाºया विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था कडेपठार मेडिकल फाउंडेशन कडेपठार पतसंस्थेकडून करण्यात येईल, अशी माहिती माणिकराव झेंडे-पाटील यांनी दिली.जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात असणारे व्यावसायिक हटवण्याची येथील शेतकºयांची मागणी असून जलाशयावर स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या अनेक शेतकºयांनी पाटबंधारे अधिकाºयांना पाणलोट क्षेत्रात धार्मिक विधीची दुकाने थाटलेल्या व्यावसायिकांची दुकाने हटवावीत, भाविकांची वाहने धरणात येण्यापासून मज्जाव करावा अशा मागण्या केल्या आहेत.पाणलोट क्षेत्रात अनेक व्यावसायिक दुकाने थाटतात, भाविकांची वाहने येतात वाहने-कपडे धुणे, स्नानविधीमुळे येथील पाणी दूषित झाले होते. हे पाणी सुमारे ५० गावांना पिण्यासाठी पुरविले जाते. त्यामुळे पुढील काळात जलाशय प्रदूषित होणार नाही, याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी उपस्थितांनी अधिकाºयांकडे केली असून त्याबाबत पाटबंधारे विभागाकडून पोलीस ठाण्याला पत्र देण्यात येणार आहे, असे सांगण्यात येते.साठा कमी असतानाही उपसानाझरे (मल्हारसागर) जलाशय कोरडा पडलेला आहे. सध्या जलाशयात दुर्गंधी सुटलेला व पिण्यालायक नसलेला गाळमिश्रित पाणीसाठा आहे. असे असतानाही जेजुरी नगरपालिका व इंडियन सीमलेस कंपनी पाणी उचलत असल्याचे निदर्शनाला आले. ही बाब अधिकाºयांच्या निदर्शनाला आणून देताच सीमलेस कंपनीच्या जबाबदार अधिकाºयांना पाणी उचलण्याचे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.पाणी उचलणे बंद कराप्रभारी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांना अपाय होणारे पाणी उचलणे बंद करावे, असे सांगण्यात आले. नगरपालिका गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक योगेश जगताप यांनी जलाशयावर जाऊन पाहणी केली आणि पाणीउपसा करणाºया वीज मोटारी कामगारांमार्फत बंद केल्या. मोरगाव, नाझरे व इतर गावांच्या पिण्याच्या पाणी योजना १ आॅगस्टपासून बंद करण्यात आल्या आहेत.