शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

‘शिवशाही’च्या हट्टापायी प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:38 IST

कामे वेळेत उरकण्यासाठी नाईलाजास्तव २०० रुपयांचा भुर्दंड सहन करून प्रवाशांना शिवशाहीने प्रवास करावा लागतो. 

ठळक मुद्देसाध्या बसलाही प्राधान्य देण्याची मागणीखासगी वाहनचालक १५० रुपये आकारून प्रवासी वाहतूक करतात

बारामती : एसटी प्रशासनाच्या शिवशाही प्रेमापोटी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बारामती बसस्थानकातून स्वारगेटसाठी शिवशाही बसलाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. या वातानुकूलित बसचे तिकीट २00 रुपये झाल्याने अनेक प्रवासी साध्या बसला पसंती देत आहेत. पण प्रशासनाच्या शिवशाही हट्टामुळे प्रवाशांची एकप्रकारे लूट होत आहे.बारामती-पुणे विनाथांबा बससेवेला बारामती परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे येथे नोकरी व कामानिमित्त दररोज प्रवास करणारे प्रवासी बारामती येथून दररोज ये-जा करीत असतात. बारामती आगारातील विनाथांबा बससेवेचा इंदापूर, बारामती, अकलूज व परिसरातील ग्रामीण भागातून दररोज हजारो प्रवासी असतात. मागील महिन्यात बारामती-पुणे विनाथांबा सेवेमध्ये वातानुकूलित शिवशाही बसचे आगमन झाले. बारामती परिसरातून पुणे येथे जाण्यासाठी प्रवासीवर्ग विनाथांबा सेवेला पसंती देत असतो. महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थी, नोकरदार व सर्वसामान्य प्रवासीवर्ग पुणे येथे जाण्यासाठी शिवशाही, निमआराम बसऐवजी साध्या बसला पसंती देत असतो. मात्र बारामती बसस्थानकातून स्वारगेट येथे जाण्यासाठी लागोपाठ शिवशाही बस सोडण्यात येत असल्याची तक्रार ‘लोकमत’शी बोलताना प्रवासीवर्गाने केली. दोन-दोन तास साध्या बसची प्रतीक्षा करावी लागते. मात्र कामे वेळेत उरकण्यासाठी नाईलाजास्तव २०० रुपयांचा भुर्दंड सहन करून प्रवाशांना शिवशाहीने प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाने एसटीची भाडेवाढ केली. या भाडेवाढीचा परिणाम थेट प्रवासीवर्गावर झाला आहे. बारामती-पुणे मार्गावर शिवशाहीचा असणारा १७१ रुपये तिकीटदर २०० रुपयांवर गेला. तर निमआराम बसचा तिकीटदर १५६ रुपयांवरून १९२ रुपयांवर गेला आहे. शिवशाही व निमआराम बसच्या तिकीटदरामध्ये फक्त ८ रुपयांचाच फरक राहिला आहे. बारामती-पुणे मार्गावर सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आदींची संख्या जास्त असते.  लागोपाठ शिवशाही किंवा निमआराम बस लागल्यास प्रवासीवर्गाच्या खिशाला झळ बसते. त्यामुळे सर्व प्रवासीवर्ग साध्या बसला पसंती देत असतो. साध्या बसची भाडेवाढ १११ रूपयांवरून १३५ रूपयांवर गेली आहे. परिणाम शिवशाही बस सलग न लावता, एका शिवशाही व एक साधी बस अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली. बारामती आगारातून पुणे विनाथांबासाठी जाणाऱ्या -येणाऱ्या मिळून  १० शिवशाही बसच्या एकूण ५२ फेऱ्या होतात. तर साध्या बसच्या ६४ फेऱ्या तर निमआराम बसच्या १४ फेऱ्या होतात, अशी माहिती वरिष्ठ आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. लागोपाठ शिवशाही व निमआराम बस लागल्यावर प्रवासी जादा तिकीट दरामुळे या बसने जाण्यास अनुत्सुक असतात. याचा फायदा उचलत खासगी वाहनचालक १५० रुपये आकारून प्रवासी वाहतूक करतात, असे आढळून आले. ..........................खिशाला झळ न बसता प्रवाशांच्या मागणीवरून शिवशाही व निमआराम बस लागोपाठ न लावता सोबत साध्या बसदेखील लावल्या जाव्यात. या पद्धतीने नियोजन केल्यास प्रवासीवर्गास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. - बाळासाहेब गावडे, जिल्हा संघटक, सचिव, महाराष्ट्र राज्य एसटी कामगारसेना

टॅग्स :BaramatiबारामतीShivshahiशिवशाहीTravelप्रवास