शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिवसेनेला गरज गनिमी काव्याची

By admin | Updated: July 25, 2016 01:00 IST

शिवसेनेच्या वतीने प्राधिकरण येथे झालेल्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या एककलमी कार्यक्रमाबद्दल जोरदार टीका करण्यात आली.

पिंपरी : शिवसेनेच्या वतीने प्राधिकरण येथे झालेल्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या एककलमी कार्यक्रमाबद्दल जोरदार टीका करण्यात आली. महापालिकेत भाजपाशी युती करायची किंवा नाही, याबद्दल पक्षप्रमुख निर्णय घेतील. मात्र, गाफील राहू नका. सर्व जागांवर तयारी करा, असेही नेत्यांनी आपल्या भाषणातून सूचित केले. सत्तेसाठी वेळप्रसंगी गनिमी काव्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले.लेवा पाटीदार भवनातील मेळाव्यास जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, शहरप्रमुख राहुल कलाटे, महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे, युवाप्रमुख अमित गावडे आदी उपस्थित होते. भाजपाने शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याने आजच्या मेळाव्यात याबाबत कोणता निर्णय होणार याबाबत चर्चा होती. यावेळी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनीही सत्तेत सहभागी असतानाही भाजपाकडून सुरू ठेवलेल्या एककलमी कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली. गुलाबराव पाटील म्हणाले, ‘‘युतीबाबत चिंता करीत बसू नका. नगरसेवक व्हायचंय, ही खूणगाठ बांधा. मतदारांना विश्वास द्या. पक्षाच्या उमेदवाराला ताकद द्या. खासदार आढळराव म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यतीबाबत कसब्यातील नेते आमच्या परिसरात येऊन श्रेय घेतात. नाशिक रेल्वे, महामार्गाचेही श्रेय स्वतकडे घेतात. पंतप्रधानांचे काम चांगले असले, तरी खालच्या पातळीवर कीड लागलीय त्याबद्दल अस्वस्थता वाटते. त्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आठवड्याला पुण्यात येतात. ते पक्षाची ताकत वाढवायला लागलेत. त्यामुळे भ्रमात राहू नये.’’खासदार बारणे म्हणाले, ‘‘न केलेल्या कामाचे श्रेय इतर पक्ष घेत आहेत. जाहिराती अ‍ॅप वापरून दिशाभूल करीत आहेत. घोषणांचा बाजार मांडला आहे. आपण सत्तेत असलो तरी सत्ता जमा झालेलो नाही. युतीचा निर्णय पक्षप्रमुखच घेतील तो मान्य राहील.’’ डॉ. कोल्हे यांनी युतिचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे सांगितले. आमदार चाबुकस्वार म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाशी युती केली तरी फायदा आणि नाही केली तरी फायदाच आहे.’’ वक्त्यांनी युतीबाबत थेट भाष्य न करता, गनिमी काव्याने लढण्याचा संकेत दिला. राहुल कलाटे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)