शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

कचरा आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादीची उडी

By admin | Updated: May 5, 2017 03:04 IST

कचरा समस्येवर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यापाठोपाठ

पुणे : कचरा समस्येवर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यापाठोपाठ आता शिवसेनेनेही उडी घेतली. ‘शहरभर कचरा... अच्छे दिन विसरा..,’ ‘महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट परदेश दौऱ्यावर पुणेकर वाऱ्यावर’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर ठाण मांडले. सत्ताधारी भाजपाला कचऱ्याचा विषय हाताळण्यात अपयश आले आहे, अशी टीका या वेळी गटनेते संजय भोसले यांनी केली. सत्ताधाऱ्यांना जाग यावी, यासाठी थाळीनाद, घंटानाद करण्यात आला. या आंदोलनात माजी गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, नाना भानगिरे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट, माजी नगरसेवक विजय देशमुख, संजय मोरे, सुनील चव्हाण, गजानन पंडित, गणेश देवरे, श्याम ननवरे, राजेंद्र शिंदे, रुपेश पवार, मंगेश म्हेत्रे, सुरेश पवळे, भाऊसाहेब कापडी, प्रमोद गोरे, मंकरद पेठकर, संजय वाल्हेकर, राजेश परदेशी याच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. एकोणीस दिवस रखडलेल्या या विषयासंदर्भात खासदार सुळे यांनी गुरुवारी दुपारी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी आयुक्तांनाही काही ठोस उत्तर दिलेले नाही, असे सांगितले. हा विषय सुटावा, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छाच दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली. मुख्यमंत्री तीन-तीन वेळा संपर्क साधूनही वेळ देत नाही. आता याच प्रश्नावरून पंतप्रधान मोदी यांनाही टॅग केले आहे. ते कधी उत्तर देतात याची प्रतीक्षा करत आहे.’’ राष्ट्रवादी काँग्रेसनेही सत्तेत असाताना काही केले नाही, याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, ‘‘चुका मान्य करूनच सहकार्याचा हात पुढे करत आहोत, मात्र तो द्यायचा कोणाच्या हातात? खासदार, आमदार करतात काय, असे मी विचारणार नाही, कारण मी माझे काम करत आहे. ग्रामस्थांबरोबर चर्चा करून आता आयुक्तांशी बोलण्यासाठी आले आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. मात्र प्रश्न सोडवायचा असेल तर सत्ताधारी हवेत व तेच नाहीत, त्याला कोण काय करणार?’’(प्रतिनिधी)संवाद करायचा कोणाशी?देशाच्या स्वच्छतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेतला आहे व त्यांचे पुणे शहरातील प्रतिनिधी पुण्याचा कचराप्रश्न वाऱ्यावर सोडून परदेशात फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांना तीन वेळा या विषयावर टॅग केले, मात्र कपिल शर्माच्या वैयक्तिक प्रश्नासाठी सगळी मुंबई महापालिका कामाला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकदाही संपर्क केला नाही, त्यामुळे आता या विषयावर संवाद करायचा कोणाशी, असा खोचक सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.