शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘शिवरायांची प्रेरणा देशासाठी मोठी’

By admin | Updated: March 17, 2017 01:43 IST

शिवरायांचा स्वाभिमान तसेच पे्ररणा व विचार देशाला घडवत राहिले़ ‘लाचारीने झुकणार नाही, मातीसाठी मरणार’ असा संदेश देणारे एकमेव

नारायणगाव : शिवरायांचा स्वाभिमान तसेच पे्ररणा व विचार देशाला घडवत राहिले़ ‘लाचारीने झुकणार नाही, मातीसाठी मरणार’ असा संदेश देणारे एकमेव छत्रपती शिवाजीराजे आहेत़ देशावर कुठलेही संकट किंवा अतिक्रमण असो, मुंबईतील हल्ला असो, कारगिलचा हल्ला असो किंवा जम्मू काश्मीरमधील पूंछ येथील लढाई असो, या सर्व लढायांमध्ये सर्वांत जास्त शहीद होणारांची संख्या ही महाराष्ट्रातील आहे. कारण मातीसाठी मरणार, हाच तर संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे़, असे मत शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी नारायणगाव येथे व्यक्त केले़ राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिवचरित्रावर व्याख्यान देताना नितीन बानगुडे पाटील बोलत होते़ या वेळी जि. प. गटनेत्या आशाताई बुचके, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, ललिता चव्हाण, अर्चना माळवदकर, रमेश खुडे, शरद चौधरी, संतोष खैरे, गणेश कवडे, सुजित खैरे, जंगल कोल्हे, योगेश पाटे, बाळासाहेब पाटे, संतोश दांगट, अनिल खैरे, ज्ञानेश्वर औटी, आरीफ आतार, योगेश गांधी, भागेश्वर डेरे, राजेश बाप्ते, मंदार पाटे, मयूर विटे, रोहित भूमकर, अमोल जगताप, संदीप मुळे उपस्थित होते़ दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगाव ते शिवनेरी अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत ५०० हून अधिक युवकांनी सहभाग घेतला होता़ नारायणगाव बाजारपेठेतून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विरोबा मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, औंदुबर स्वराज्य मित्र मंडळ, कुलस्वामिनी मित्र मंडळ आदींनी सहभाग घेतला होता़सत्यशील शेरकर म्हणाले, की तिथी असो तारीख जुन्नर तालुक्यात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो़ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा ३६५ दिवस जरी केला तरी तो कमीच आहे़ माऊली खंडागळे म्हणाले, की शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळ्यात पाश्चात्य देशातील नागरिक किल्ल्यावर आले होते़ त्यांना आम्ही विचारले तुम्ही या ठिकाणी का आलात, तर त्यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुण्यस्थानला मुजरा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. यावरूनच शिवाजीमहाराजांची ख्याती असून भारतात नव्हे तर सर्व देशांमध्ये युद्धनीती अभ्यासली जात आहे, ही आपल्या दृष्टीने गौरवाची बाब आहे़ याप्रसंगी आशाताई बुचके, ललिता चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब गुंजाळ, अशोक गांधी, सुंदराताई कुऱ्हाडे, खंडू मेहेत्रे, किसन डेरे, अक्षय बोऱ्हाडे, डॉ. एम. बी. भोर, किरण सोलाट, योगेश (बाबू) पाटे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ ज्ञानेश्वर औटी, मेहबूब काझी, हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले, तर बाळासाहेब पाटे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)