शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

शिर्सुफळला तणाव

By admin | Updated: February 24, 2015 00:31 IST

शिर्सुफळ येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला भूसंपादन करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असताना आज मोठ्या

बारामती : शिर्सुफळ येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला भूसंपादन करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असताना आज मोठ्या बंदोबस्तात कामाला सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तंग झाले. पोलिसांच्या दडपशाहीमुळे पोलीस व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे वातावरण तंग झाले. शिर्सुफळ (ता. बारामती) च्या गायरान जागेत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यासाठी उर्वरित जागा देखील संपादित केली जाणार आहे. त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांच्या निवेदनावर अहवाल सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत, असे असताना आज अचानक कामाला सुरुवात करण्यात आली. त्याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. ग्रामस्थांचा विरोध डावलून काम सुरू केल्याने पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. त्यांनंतर ग्रामस्थ व प्रांताधिकारी यांच्या चर्चा झाली. त्यावर तोडगा निघाला नाही. ग्रामस्थांनी आपला विरोध कायम असल्याचे सांगितले.या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन सौरऊर्जा प्रकल्पात होत असलेल्या गैरप्रकारची माहिती दिली. त्यावर मुंडे यांनी विभागीय आयुक्तांना याबाबत अहवाल सादर करावा. तोपर्यंत काम बंद ठेवावे, असे आदेश दिले. त्याची पूर्तता झाली नसताना देखील कामाला सुरूवात करण्यात आली. आज सकाळी काम सुरु करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद मोरे यांच्यासह बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर येथील पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने गावात दाखल झाले. गावाला पोलिस छावणीचे स्वरुप आले. यावेळी ग्रामस्थही एकत्र येत आमचा विरोध कायम असल्याचे व याबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे सांगितले.ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांचा अहवाल आल्याशिवाय काम सुरू करू नये, असे प्रांताधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर ग्रामविकास मंत्र्यांचे आदेश विभागीय आयुक्तांना आहेत. त्यांचा आदेश मला आलेला नाही. त्यामुळे काम थांबवू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे काम सुरू करण्यात आले. ग्रामस्थांनी काही काळ रस्ता रोखून धरला. मात्र पोलीस बळाच्या पुढे काही टिकाव लागला नाही. पोलिसांनी बळाचा वापर करून रास्ता रोको मोडून काढला. प्रशासनाच्या या बळजबरीमुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोप करण्यात आला. यामुळे आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.