शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

शिवाजीमहाराज मॅनेजमेंट गुरूच

By admin | Updated: January 19, 2016 01:53 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दुष्काळासारख्या समस्यांवर ज्या प्रकारे उत्तम उपाययोजना केल्या होत्या, त्यावरूनच महाराज हे सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू होते,

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दुष्काळासारख्या समस्यांवर ज्या प्रकारे उत्तम उपाययोजना केल्या होत्या, त्यावरूनच महाराज हे सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू होते, हे दिसून येते. हीच बाब विद्यार्थ्यांपर्यंत पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमातून येण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ यांच्या सीबीएससी, बी. फार्मसी, डी. फार्मसी व टेक्नॉलॉजी या इमारतीच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते; त्या वेळी ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष एम. एन. नवले, एमआयटीचे सचिव मंगेश कराड, मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत छाजेड, कॉसमॉस बँकेचे कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते. जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते रसिकलाल व शोभा धारिवाल यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.जैन विद्या प्रसारक मंडळ व रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने सीबीएससी बोर्डाशी संलग्न अभ्यासक्रम सुरू केला आहे. विविध अभ्यासक्रम व इमारतीसाठी फाउंडेशनच्या वतीने मंडळास नऊ कोटी रुपयांची मदत करण्यात आली. पाच कोटी रुपये सीबीएससी इंग्रजी माध्यम शाळेसाठी, दोन कोटी रुपये फार्मसी अभ्यासक्रमासाठी, तर दोन कोटी रुपये पॉलिटेक्निक विभागासाठी देण्यात आले आहेत. या देणगीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते.रसिकलाल धारिवाल म्हणाले की, एखाद्या गोष्टीचा वसा घेतला की, ती गोष्ट सर्वोत्तम पद्धतीने झाली पाहिजे, असा माझा पहिल्यापासूनच आग्रह आहे. त्यामुळे सुरू केलेले सीबीएससी इंटरनॅशनल स्कूल सर्वोत्तम बनविण्याचा प्रयत्न करू, ज्याचा पालकांनाही अभिमान वाटायला हवा. शोभा धारिवाल म्हणाल्या की, सीएसआरअंतर्गत विविध संस्थांना एकत्र आणून विचारांची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. स्वागत राजेशकुमार साकला यांनी केले. आभार प्रकाश चोपडा यांनी मानले. आयोजन धनंजय कुलकर्णी व सतीश भारती यांनी केले. जैन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना सन १९२७ साली करण्यात आली. सुमारे १५००० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. ६०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. रसिकलाल एम. धारीवाल फाउंडेशन आरोग्यसेवा, जनावरांसाठी चारापुरवठा, वृक्षारोपण, नेत्रशिबिर पाणीपुरवठा आदी उपक्रम राबवीत आहे.