शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरचे शेतकरी आक्रमक

By admin | Updated: April 17, 2017 06:34 IST

चासकमान धरणातून सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन शिरूरच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना प्रथम मिळण्यासाठी चाकण - शिक्रापूर रस्त्यावर रविवारी

केंदूर : चासकमान धरणातून सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन शिरूरच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना प्रथम मिळण्यासाठी चाकण - शिक्रापूर रस्त्यावर रविवारी या भागातील शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन केले. पाणी ‘टेल टू हेड’ अशा स्वरूपाचे सोडण्यात येत असल्यामुळे शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांवर अन्याय होत आहे. धरणासाठी भूसंपादन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले होते. मात्र पाण्यासाठी आज याच भागाला शिरूरच्या पूर्व भागात प्रथम पाणी दिल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ येत आहे. या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप या गावांना कालव्यास पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती सहन करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. उन्हाळ्यातील पिकांची या भागातील परिस्थिती अत्यंत बिकट असून पाण्यावाचून पिके जळू लागलेली आहेत. शासनाच्या निर्णयामुळे मागील वर्षी याच भागातील उसाचे खूप मोठे नुकसान या भागातील शेतकऱ्यांना सहन करावे लागले होते. यंदाही असाच प्रकार पुन्हा होत आहे. जमीन महसूल कायद्यातील कलम ७०/२ नुसार पाणी प्रथम याच भागात देणे अपेक्षित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये प्रथम करण्यात आलेली होती. त्यामुळे या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप येथील शेतकरी आक्रमक झालेले असून पाण्यासाठी मोठा लढा उभा करण्यात आलेला आहे. या वेळी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांच्यावर गुन्हा दाखल करीत आल्याने या वेळी संताप व्यक्त करण्यात आला. या वेळी संबंधित चासकमान पाटबंधारे शाखाधिकारी शंकर संतीकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्याकडे या वेळी निवेदन देण्यात आले. या आंदोलनात प्रामुख्याने समाधान डोके, नीलेश जगताप, जयश्री पलांडे, पुष्पा जगताप, मोहन टाकळकर, धर्मराज वाजे, अशोक बेंडभर, शिवाजी जगताप, सागर शितोळे, विकास मासळकर, दत्तात्रय मासळकर, विजय खैरे, प्रदीप मासळकर, दीपक मासळकर, ज्ञानेश्वर थिटे, नितीन वाजे, ऋषीकेश थिटे, उत्तम बेंडभर, रामभाऊ सोंडेकर, अनिल काशीद, एकनाथ मासळकर व बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. (वार्ताहर)