शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

शिरूर तालुक्यात शेतीलाच काय, प्यायलाही पाणी नाही!

By admin | Updated: May 6, 2017 01:39 IST

शिरूर तालुक्यात भारनियमनाचे सावट सर्वत्रच पसरले असून, ज्या भागात पाणी आहे, त्या भागात भारनियमनामुळे उभी पिके

शिरूर तालुक्यात भारनियमनाचे सावट सर्वत्रच पसरले असून, ज्या भागात पाणी आहे, त्या भागात भारनियमनामुळे उभी पिके जळताना शेतकऱ्यांना पाहावी लागत आहेत. तर दुसरीकडे, शेतीलाच काय तर प्यायलाही पाणी नसल्याने भारनियमनाबाबत त्यांना सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.टाकळी हाजी विभागात पाणी आहे; मात्र १५ ते १८ तासांच्या भारनियमनामुळे पिके जळू लागल्याचे वास्तव आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंब सुकू लागल्याचे जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनीच सांगितले. शेतीपंपासाठी असणारी (थ्री फेज) वीज दुपारी दोनला जाते ती दुसऱ्या दिवशी सकाळी आठलाच येते. जवळपास १८ तासांचे हे भारनियमन असून, त्यामुळे पिकांचे नियोजनच कोलमडल्याचे गावडे यांनी सांगितले. पश्चिम पट्ट्यात पाबळ विभागात ८ तासांचे भारनियमन आहे. कान्हूरमेसाई भागातही अशाच प्रकारची परिस्थिती आहे. तळेगाव- ढमढेरे विभागात उद्यापासून ८ तासांचे भारनियमन सुरू केले जाणार आहे. न्हावरे, मांडवगण फराटा, शिरसगाव काटा, कुरुळी या पूर्व पट्ट्यात पाण्याची स्थिती सध्या ठीक आहे. कुरुळी भागात मोठ्या प्रमाणावर तरकारीचे पीक घेतले जाते. रांजणगाव सांडस परिसरात तर फक्त ४ ते ५ तासच वीज असते. बाकीचा वेळ अघोषित भारनियमनाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. निमोणे-गुनाट भागात फक्त ८ तास वीज असते. म्हणजे १६ तासांच्या भारनियमनाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम ऊस, भुईमूग व चारा पिकांवर झाला आहे. कोरेगाव भीमा भागात नेरेगाव, सणसवाडी, डिंग्रजवाडी, दरेकरवाडी, वढू बुद्रुक या ठिकाणी भारनियमन सध्या नाही. मात्र, पिंपळे जगताप भागात आठ तासांचे भारनियमन केले जात आहे.