शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शिरूर नगर परिषद सर्वाधिक स्वच्छ

By admin | Updated: March 5, 2016 00:36 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसंदर्भातील शिरूर नगर परिषदेचे काम अतिशय समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया शासनाच्या हागणदारीमुक्त शहर तपसाणी पथकाचे

शिरूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसंदर्भातील शिरूर नगर परिषदेचे काम अतिशय समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया शासनाच्या हागणदारीमुक्त शहर तपसाणी पथकाचे प्रमुख, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे प्रादेशिक संचालक व्ही. बी. निलावाड यांनी येथे व्यक्त केली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ‘क’ वर्ग नगर परिषदेपैकी शिरूर नगर परिषद सर्वाधिक स्वच्छ व सुंदर असल्याचे कौतुकही निलावाड यांनी केले.स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शिरूर नगर परिषदेला हागणदारीमुक्त योजनेत फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर पडताळणी करण्यासाठी शासनाचे पथक दोन दिवसांपूर्वी शहरात दाखल झाले. दोन दिवसांच्या तपासणीनंतर आज नगर परिषदेत नगरसेवकांसमोर निलावाड बोलत होते. पथकातील सदस्य, परभणीचे उपायुक्त रणजित पाटील यांनीही हागणदारीमुक्तीबाबत चांगली परिस्थिती निर्माण केल्याचे म्हटले. नागरिकांशी संवाद साधला असता त्यांची मानसिकता बदलल्याचे निदर्शनास आले. प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी मिळून खंबीर भूमिका घेतल्याचे जाणवले, असे पाटील म्हणाले. नगरसेवक जाकीरखान पठाण व मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी हागणदारीमुक्तीबाबत माहिती दिली. पठाण म्हणाले, की ओरिजनल लोकसंख्येपेक्षा शहरात फ्लोटिंग लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. रांजणगाव एमआयडीसीमुळे यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे सॅनिटरी, पाणीपुरवठा यांबाबत नगर परिषदेवर ताण पडतो, हागणदारीमुक्तीसाठी काम करणे आव्हानात्मक आहे. तरीही यशस्वीरीत्या या योजनेची वाटचाल सुरू आहे. डॉ. थोरात म्हणाले, की वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी शासनाच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले जात असून, ४०० हून अधिक शौचालये उभारली आहेत. ज्या पटांगणावर झाडे वाढल्याने आडोसा घेऊन हागणदारी वाढत होती, ती पटांगणे नगर परिषदेने साफ केली. सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती केली. नगराध्यक्षा मनीषा गावडे, समितीचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी प्रवीण शिंगटे, स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती रवींद्र ढोबळे, नगरसेवक संतोष भंडारी, महेंद्र मल्लाव, अशोक पवार, आबीद शेख, नगरसेविका उज्ज्वला बरमेचा, सुनीता कालेवार, सुवर्णा लटांबळे, सुवर्णा लोळगे, कविता वाटमारे, प्रा. प्रभुलिंग वळसंगे, तुकाराम खोले, प्रशांत शिंदे, डी. टी. बर्गे उपस्थित होते.