शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

शिरूर, मुळशीचे वाचले पाणी!

By admin | Updated: January 7, 2016 01:40 IST

जिल्ह्यातील भामा-आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र

पुणे : जिल्ह्यातील भामा-आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने बुधवारी दिला. त्यामुळे शिरूर व मुळशी तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. येथील जनता प्राधिकरणाच्या निर्णयाची वाट पाहत होती. कारण पुन्हा पाणी सोडण्याचा निणर्य प्राधिकरणाने घेतला, तर चासकमान लाभक्षेत्रातील १ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात येणार होती व मुळशीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार होता.यापूर्वी चासकमान धरणातून ८९.१२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले होते. धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ८९ दलघमी पाणी सोडले, तर चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३० ते ३५ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यावर येथील सिंचनासाठीचे १ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यात धरणातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू होते. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश होता. यामुळे धरणातील पाणीपातळी खालावली होती. जर पूर्वीचा आदेश कायम ठेवला असता, तर पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळाले नसते. पिकं जळून गेली असती. त्यामुळे येथील शेतकरी पाणी सोडू देण्यास विरोध करीत होते. शेती वाया जाणार असल्याने शेतकरी या निर्णयकडे लक्ष ठेवून होते. आज नव्याने निर्णय आला असून, यात धरणातून २०.७० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. यापूर्वी ते ८९.१२ दलघमी होते. म्हणजे ६८.४२ म्हणजे २.३० टीएमसी पाणी वाचले आहे. तसेच कुकडी प्रकल्पातून घोड धरणात सुमारे ३४ दलघमी पाणी सोडण्याचे आदेशही मंगळवारी प्राधिकरणानी दिले आहेत. याचाही फायदा शिरूर तालुक्याला मिळणार आहे. (प्रतिनिधी)