शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला २ दिवसाआड पाणी

By admin | Updated: June 19, 2016 04:36 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात जूनअखेर पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून, या कारणास्तव शहराला आजपासून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय

शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात जूनअखेर पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून, या कारणास्तव शहराला आजपासून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने नगर परिषदेने १७ मार्चपासून (२०१५) शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने नगर परिषदेने बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या बंधाऱ्यातून पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. या दरम्यान पाणीसाठा अत्यल्प झाल्याने नगर परिषदेने ३ एप्रिलपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. वरील भागातील बंधाऱ्यातून पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांना तेथील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, नगर परिषदेने प्रयत्न सोडला नाही. अखेर वरील बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने १७ एप्रिलला बंधाऱ्यात पाणी आले. हे पाणी आल्याने पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. नगर परिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कुकडी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार कालव्याद्वारे सोडलेले पाणी ५ मे रोजी बंधाऱ्यात पोहोचले. मात्र, याने अर्धाच बंधारा भरला. यानंतर पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.बंधाऱ्यात सध्याची परिस्थिती पाहता जूनअखेर पुरेल इतकेच पाणी उपलब्ध असल्याने आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय नगर परिषदेला घ्यावा लागला.शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसाकुकडी कालव्याद्वारे आलेल्या आवर्तनातून पूर्ण बंधारा भरेल, अशी अपेक्षा होती. मात्र अर्धाच बंधारा भरला. यातच मार्च महिन्यापासून जेव्हा जेव्हा पाणी उपलब्ध झाले तेव्हा बंधाऱ्यातून पारनेरच्या हद्दीतील शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतीपंपाद्वारे पाणीउपसा केला. यामुळे बंधाऱ्यात पिण्यासाठी असलेले पाणी झपाट्याने कमी झाले. पारनेरच्या महसूल अधिकाऱ्यांना नगर परिषदेने वेळोवेळी शेतीसाठी घेणारा पाणीउपसा बंद करण्याची मागणी केली. मात्र, या अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केले.