शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शिरूरकरांना दोन दिवसांआड पाणी!

By admin | Updated: April 2, 2016 03:26 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात (हत्ती डोह) पाणीसाठा घटल्याने पाण्याचे आवर्तन मिळेपर्यंत शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची

शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात (हत्ती डोह) पाणीसाठा घटल्याने पाण्याचे आवर्तन मिळेपर्यंत शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सभापती जाकीरखान पठाण यांनी दिली.गेल्या पंधरवड्यापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आज पठाण, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, नगरसेवक महेंद्र मल्लाव, प्रवीण दसगुडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख भगवान दळवी यांनी हत्तीडोहला भेट देऊन पाण्याच्या पातळीची पाहणी केली. या वेळी जॅकवेलची जाळी उघडी पडल्याचे निदर्शनास आले. उपलब्ध पाणी आवर्तन येईपर्यंत पुरवायचे झाल्यास दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागेल, असे निदर्शनास आले. असे केल्यासच आवर्तन येईपर्यंत पाणी पुरू शकेल अशी परिस्थिती आहे. पाण्याच्या आवर्तनासाठी १५ मार्चलाच मागणी केली असून, १५ एप्रिलला आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. १५ एप्रिलला आवर्तन सुटल्यास बंधाऱ्यात २० एप्रिलपर्यंत पाणी पोहोचेल, असे पठाण यांनी सांगितले. या आढाव्यानुसार दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था निर्माण झालेली असताना बंधाऱ्यातून पारनेर बाजूने शेतीपंपाने शेतीसाठी पाणीउपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. यामुळेच पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. पारनेरच्या प्रांताधिकाऱ्यांना या शेतीपंपावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या शेतीपंपावर कारवाई करणे सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे. पाणी काटकसरीने वापरादिवसाआडच्या रोटेशननुसार शहराला उद्या (दि. २) पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सभागृहनेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी केले.