शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरकरांना दोन दिवसांआड पाणी!

By admin | Updated: April 2, 2016 03:26 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात (हत्ती डोह) पाणीसाठा घटल्याने पाण्याचे आवर्तन मिळेपर्यंत शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची

शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात (हत्ती डोह) पाणीसाठा घटल्याने पाण्याचे आवर्तन मिळेपर्यंत शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सभापती जाकीरखान पठाण यांनी दिली.गेल्या पंधरवड्यापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आज पठाण, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, नगरसेवक महेंद्र मल्लाव, प्रवीण दसगुडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख भगवान दळवी यांनी हत्तीडोहला भेट देऊन पाण्याच्या पातळीची पाहणी केली. या वेळी जॅकवेलची जाळी उघडी पडल्याचे निदर्शनास आले. उपलब्ध पाणी आवर्तन येईपर्यंत पुरवायचे झाल्यास दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागेल, असे निदर्शनास आले. असे केल्यासच आवर्तन येईपर्यंत पाणी पुरू शकेल अशी परिस्थिती आहे. पाण्याच्या आवर्तनासाठी १५ मार्चलाच मागणी केली असून, १५ एप्रिलला आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. १५ एप्रिलला आवर्तन सुटल्यास बंधाऱ्यात २० एप्रिलपर्यंत पाणी पोहोचेल, असे पठाण यांनी सांगितले. या आढाव्यानुसार दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था निर्माण झालेली असताना बंधाऱ्यातून पारनेर बाजूने शेतीपंपाने शेतीसाठी पाणीउपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. यामुळेच पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. पारनेरच्या प्रांताधिकाऱ्यांना या शेतीपंपावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या शेतीपंपावर कारवाई करणे सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे. पाणी काटकसरीने वापरादिवसाआडच्या रोटेशननुसार शहराला उद्या (दि. २) पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सभागृहनेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी केले.