शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मेंढपाळांवर आली भटकंतीची वेळ

By admin | Updated: May 12, 2017 04:53 IST

इंदापूर तालुक्यात दर वर्षी हंगामी पिके शेतकरी घेत होते. त्यामुळे मेंढपाळ तालुक्यात हंगामानुसार आपल्या कुटुंबासह दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : इंदापूर तालुक्यात दर वर्षी हंगामी पिके शेतकरी घेत होते. त्यामुळे मेंढपाळ तालुक्यात हंगामानुसार आपल्या कुटुंबासह दाखल होत असत. सहा महिने शेतकऱ्यांच्या जमिनीवर मेंढ्या बसवून ज्वारी, पैसे यांच्या मोबदल्यात शेतकरी मेंढपाळांना मिळत असे. मात्र, आंतरपिके घेण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. मेंढपाळांना जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत. शेतीच्या आधुनिकीकरणामुळे मेंढपाळांना हजारो मेंढ्या जगवण्यासाठी रस्त्याच्या कडेनेच भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. ना चारा, ना पाणी. मेंढ्या बसवण्यासाठी शिल्लक जमिनी उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच आपली पाले ठोकून दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.मेंढपाळ दत्तू रामा ठोंबरे याच्याकडे ६०० मेंढ्या उपलब्ध आहेत. त्यांना घेऊन कुटुंबासह ३ महिन्यांपासून ते बाहेर पडलेले आहेत. तीन महिन्यांत तालुक्यातील एकाही शेतकऱ्याने आपल्या शेतात मेंढ्या बसवल्या नाहीत. त्यामुळे दोन-दोन मेंढ्या विकून आपले कुटुंब जगवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तर, या मेंढ्यांना जगवण्यासाठी तालुक्यात कुठेही जमिनीवर चारा उपलब्ध नाही. दत्तू ठोंबरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना स्वत:ची शेती असताना त्याच्या जनावरांच्या चारापाण्याची सुविधा म्हणून चारा छावण्या उभरल्या जातात. ज्या मेंढपाळांना गुंठाभर जमिनी नसतात, त्यांना मात्र चारा छावण्या उभारल्या जात नाहीत. शासनाच्या कोणत्याही सुविधा या मेंढपाळांना मिळत नाहीत. भटकंती करणारा हा समाज स्थिर होण्यापासून वंचित राहिला आहे. शासनाने अशा भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना चारा छावण्यांत समाविष्ट करून घ्यावे, अशी अपेक्षा या मेंढपाळांची आहे.