शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

शशीजींची कर्करोग रुग्णांवरही मायेची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 07:04 IST

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात आर.के.स्टुडिओ असल्याने कपूर मंडळींची या गावात बरीच ऊठबस होती. शशी कपूर यांना कामाच्या धबडग्यातून विश्रांती घ्यायची असेल

विश्वास खोड पुणे : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात आर.के.स्टुडिओ असल्याने कपूर मंडळींची या गावात बरीच ऊठबस होती. शशी कपूर यांना कामाच्या धबडग्यातून विश्रांती घ्यायची असेल, तर ते लोणीमधील बंगल्यात मुक्कामी असत. लोणी हे त्यांचे आवडते ठिकाण होते. कर्करुग्णांना भेटण्यासाठी, मदत करण्यासाठी हा संवेदनशील मनाचा अभिनेता मंगळवार पेठेत अनेकदा आल्याचीही आठवण आहे.राज कपूर यांनी लोणीमध्ये जमीन खरेदी करून स्टुडिओ बांधला. निसर्गरम्य अशा या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रणही झाले आहे. लोणी काळभोरमधील एका शाळेला स्व. पृथ्वीराज कपूर यांचे नाव राज कपूर यांच्या आग्रहावरून देण्यात आले आहे. राज कपूर यांचा या गावातील तालेवार मंडळींकडे अधूनमधून राबता असे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य रामचंद्र काळभोर यांच्याकडेते भोजनासाठीही आल्याची आठवण आहे.शशी कपूर कर्करुग्णासांठी काम करणाºया ‘सिप्ला’ संस्थेशीही संलग्न होते. अशा रुग्णांना ते स्वत: भेटून दिलासा देत असत. सुमारे १२ वर्षांपूर्वी पुण्यात राहणाºया शकुंतला बारणे (५७, मंगळवार पेठ) नामक महिलेला भेटण्यासाठी आपण शशी कपूर यांच्यासमवेत गेलो एका वाड्यात गेलो होतो, अशी आठवण रामचंद्र काळभोर (वय ८५) यांना आहे. या बाबतीत अधिक आठवण नमूद करताना या वाड्यातील रजनी वसंत खेडेकर म्हणाल्या, की मी काँग्रेस कार्यकर्ता असल्याने मला शशी कपूर यांच्या उदारपणाची माहिती होते. शकुंतला बारणे यांना भेटण्यासाठी शशीजी स्वत: तीन वेळा आले. त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना ते अशा रुग्णांकडे पाठवीत असत. स्वत: दूध, औषधांसाठी खर्च करीत असत.वालचंदनगरमध्ये ‘कलियुग’चे चित्रीकरणइंदापूर : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर सन १९८० -८१ मध्ये त्यांच्या 'कलियुग' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तालुक्यातील औद्योगिक नगरी असणाºया वालचंदनगर येथे आले होते. गडद रंगाच्या उंची सुटाबुटात समोर आलेल्या त्या वेळच्या या देखण्या, उंचपुºया व सडसडीत देहयष्टीच्या मात्र कमालीच्या ऊर्जावान अभिनेत्याची वालचंदनगरवासीयांवर पडलेली छाप आजही अमीट आहे.शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर कँडल त्यांच्यासमवेत आल्या होत्या. वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या साखर कारखान्यात चित्रीकरण झाले होते. ते आटोपल्यानंतर तेथेच त्यांनी स्थानिक कामगारांशी आपुलकीने संवाद साधला होता. त्यांना पाहण्यासाठी आलेल्या जनसमुदायासदेखील त्यांनी नाराज केले नव्हते.साधारणत: दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विनोदनालयाच्या पटांगणात असणाºया विस्तीर्ण मंचावर येऊन त्यांनी वालचंदनगरकरांचे स्वागत स्वीकारलेच; त्याबरोबर रसिकांच्या पाठबळावर आपण यशस्वी झालो, असे सांगत चित्ररसिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांची मने जिंकली होती. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात वालचंदनगरमधील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अ‍ॅथलीट अर्जुन गायकवाड, कुस्तीपटू तथा उद्योजक उत्तम फडतरे व इतरांचा कपूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.