शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

कान्हूरमेसाई येथे तीव्र पाणीटंचाई: गटविकास अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

कान्हूरमेसाई: येथील सार्वजनिक विहिरीच्या ५०० मीटर अंतरावर काही जणांनी अनधिकृत बाेअरवेल घेतले आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी पातळीत ...

कान्हूरमेसाई: येथील सार्वजनिक विहिरीच्या ५०० मीटर अंतरावर काही जणांनी अनधिकृत बाेअरवेल घेतले आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी पातळीत घट होत असून वाड्या वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, तहसीलदार लैला शेख यांनी या अनधिकृत बोअरवेलवर कारवाईचे निर्देश महावितरणला दिले आहे.

कान्हूरमेसाईसह परिसरातील वाड्या-वस्त्यांना सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीने टंचाई निधीमधून हिवरे येथून पाईपलाईनने पाणी आणून ते सार्वजनिक विहिरीत सोडले जाते. आणि हा पाणी पुरवठा होता. मात्र, काही जणांनी विहिरीच्या ५०० मीटर अंतरावर बोअरवेल घेतले आहे. अनधिकृत कनेक्शनद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे काही दिवसांपासून हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या तर या विहिरीच्या पाणीपातळीत घट झाली असून ग्रामस्थांना पाण्याची तीव्र टंचाई होत असल्याचे सरपंच चंद्रभागा खर्डे यांनी सांगितले .

दरम्यान, यासंदर्भात ग्रामपंचायतीने तहसीलदार लैला शेख यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर शेख यांनी या अनधिकृत बोअरवेलवर कारवाईचे निर्देश महावितरणला दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी बोअरवेल धारकांना नोटीस बजावल्या आहेत.

०७ कान्हूरमेसाई

विहिरीजवळील बोअरवेलची पाहणी करताना विजयासिंह नलावडे, के. बी घासले व ग्रामस्थ.