शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

दोन महिन्यांपासून तीव्र टंचाई

By admin | Updated: May 11, 2015 05:57 IST

नीरा देवघर धरणाच्या काठावर असलेल्या निवंगण गावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला.

भोर : नीरा देवघर धरणाच्या काठावर असलेल्या निवंगण गावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला. त्यानंतर एकदाच टॅँकर आला होता. यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण सुरु असून, अर्धा किलोमीटरवर असलेल्या शिवकालीन साठवण विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. तसेच येथील पाणी खराब झाले असून, हेच दूषित पाणी लोकांना प्यावे लागत असून, ६ ते ७ हांडे वाटून घेतात. जनावरांना पाण्यासाठी ६ किलोमीटरवर असलेल्या नीरा देवघर धरणावर घेऊन जावे लागते. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील महिलांसह ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. नीरा देवघर धरणाच्या काठावर सुमारे ६०० ते ७०० लोकवस्तीचे निवंगण हे गाव असून, दोन वाड्या आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून गावात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे रायरेश्वर किल्ल्यावरुन उताराची नळ पाणीपुरवठा योजना २० वर्षांपूर्वी करण्यात आली आहे; मात्र गावाची लोकसंख्या वाढल्याने व दिवसेंदिवस पाणी कमीकमी होत गेल्याने दर उन्हाळ्यात सदरच्या योजनेला पाणी कमी पडत आहे. सन २००७मध्ये गावापासून एक किलोमीटर रिंगरोडजवळच्या शेतात शिवकालीन साठवण विहीर बांधण्यात आली आहे; मात्र सदरच्या विहिरीलाही मार्च महिन्यापर्यंतच पाणी असते, नंतर पाणी कमीकमी होत जाऊन खराब होत जाते. त्यामुळे टॅँकरची मागणी करावी लागत असल्याचे सरपंच किसन दिघे व आनंदा दिघे यांनी सांगितले.या वेळी टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला; मात्र गावात फक्त ४ व ७ मे रोजी दोन वेळा अर्धा अर्धा टॅँकर गावात आला. त्यानंतर टॅँकर फिरकलाच नसल्याचे प्रवीण दिघे व अंकुश दिघे यांनी सांगितले. (वार्ताहर)दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यातदरवर्षी उन्हाळ्यात महिलांना शिवकालीन विहिरीवरून पायपीट करून पाणी आणावे लागते. सदरचे पाणी कमी झाल्याने खराब झाले असून, दूषित झाले आहे; मात्र गावात इतरत्र कुठेच पाण्याची सोय नसल्याने हेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर टँकर सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.