शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दोन महिन्यांपासून तीव्र टंचाई

By admin | Updated: May 11, 2015 05:57 IST

नीरा देवघर धरणाच्या काठावर असलेल्या निवंगण गावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला.

भोर : नीरा देवघर धरणाच्या काठावर असलेल्या निवंगण गावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला. त्यानंतर एकदाच टॅँकर आला होता. यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण सुरु असून, अर्धा किलोमीटरवर असलेल्या शिवकालीन साठवण विहिरीवरुन पाणी आणावे लागत आहे. तसेच येथील पाणी खराब झाले असून, हेच दूषित पाणी लोकांना प्यावे लागत असून, ६ ते ७ हांडे वाटून घेतात. जनावरांना पाण्यासाठी ६ किलोमीटरवर असलेल्या नीरा देवघर धरणावर घेऊन जावे लागते. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील महिलांसह ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. नीरा देवघर धरणाच्या काठावर सुमारे ६०० ते ७०० लोकवस्तीचे निवंगण हे गाव असून, दोन वाड्या आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून गावात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे रायरेश्वर किल्ल्यावरुन उताराची नळ पाणीपुरवठा योजना २० वर्षांपूर्वी करण्यात आली आहे; मात्र गावाची लोकसंख्या वाढल्याने व दिवसेंदिवस पाणी कमीकमी होत गेल्याने दर उन्हाळ्यात सदरच्या योजनेला पाणी कमी पडत आहे. सन २००७मध्ये गावापासून एक किलोमीटर रिंगरोडजवळच्या शेतात शिवकालीन साठवण विहीर बांधण्यात आली आहे; मात्र सदरच्या विहिरीलाही मार्च महिन्यापर्यंतच पाणी असते, नंतर पाणी कमीकमी होत जाऊन खराब होत जाते. त्यामुळे टॅँकरची मागणी करावी लागत असल्याचे सरपंच किसन दिघे व आनंदा दिघे यांनी सांगितले.या वेळी टॅँकरची मागणी करुन एक महिना झाला; मात्र गावात फक्त ४ व ७ मे रोजी दोन वेळा अर्धा अर्धा टॅँकर गावात आला. त्यानंतर टॅँकर फिरकलाच नसल्याचे प्रवीण दिघे व अंकुश दिघे यांनी सांगितले. (वार्ताहर)दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यातदरवर्षी उन्हाळ्यात महिलांना शिवकालीन विहिरीवरून पायपीट करून पाणी आणावे लागते. सदरचे पाणी कमी झाल्याने खराब झाले असून, दूषित झाले आहे; मात्र गावात इतरत्र कुठेच पाण्याची सोय नसल्याने हेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर टँकर सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.