भोर : उन्हाचा तडाखा वाढल्याने दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढतेय. भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील भुतोडे, वेळंवड, नीरा-देवघर धरण खोर्यातील व महुडे भागातील २१ वाड्यावस्त्यांना, ९ गावांना ४ टँकर व ३ पिकअपद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाई वाढत आहे. दोन्ही धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील निवंगण धारांवे, कळवाचा माळ, पºहर बुद्रुक, धानवली, धनगरवस्ती, माझेरी, शिखली, हिर्या, कुडली बुद्रुक, चौधरीवस्ती, दुर्गाडी, अत्रेपुरी, मानटवस्ती, वारवंड, कारुंगण, सुईरमाळ, उबार्डेवाडी, उबार्डे, नेरडमाळ, महुडे बुद्रुक, भानुसदरा, आखाडेवस्ती, हरिजनवस्ती, गृहिणी, खुलशी, डेरे, भुतोडे, हुंबेवस्ती, जळकेवाडी, महादेववाडी, आंबेवाडी, सुतारवाडी, मिटकुटवाडी या गावांना, वाड्यावस्त्यांना ४ टँकर व ३ पीकअप जीपमधून पाणीपुरवठा दररोज एक खेप याप्रमाणे सुरू आहे. याशिवाय धारांबे, शिरगांव, शिळीव, आरिपी, कुंड, राजिवडी, साळुंगण या गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव १५ दिवसांपूर्वीच सादर केले आहेत. या गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे. शिरगाव व शिळीव गावांच्या नळपाणी पुरवठा विहिरींना पाणी कमी पडल्याने टंचाई आहे, तर कुंड आरिपीतील, उवार्डेमधील शिवकालीन विहिरीला पाणी नाही. त्यामुळे टंचाई जाणवत आहे. नीरा-देवघर धरणात २ टीएमसी (१७.६७ टक्के), भाटघर धरणात २ टीएमसी (८.४९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा-देवघर धरणाच्या गेटमधून १,६०० क्युसेक्सने, तर वीजनिर्मिती केंद्रातून ८,००० क्युसेक्सने, असे २,४०० क्युसेक्सने पाणी सोडले आहे. (वार्ताहर)
धरण खोर्यात तीव्र टंचाई
By admin | Updated: May 22, 2014 05:49 IST