शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वेदनादायक माळीण दुर्घटनेला सात वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:09 IST

नीलेश काण्णव लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून जमिनीत गाडल्या ...

नीलेश काण्णव

लोकमत न्यूज नेटवर्क

घोडेगाव : निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून जमिनीत गाडल्या गेलेल्या दुर्देवी माळीणच्या घटनेला उद्या शुक्रवारी (दि.३०) सात वर्षे पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेत ४४ कुटुंबातील १५१ लोक दगावले. या घटनेच्यास्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. यावर्षी माळीणप्रमाणे कोकणात तळीये गावात व इतर ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने माळीणकरांच्या त्या जखमा ताज्या झाल्या.

रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात संपूर्ण गावच ढिगाऱ्यात गाडले गेले. ४० कुटुंबातील १५१ लोकांचा मृत्यू झाला. यातील ९ लोक जखमी झाले. तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासकीय यंत्रणेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढगाऱ्याचे खोदकाम केले व १५१ मृतदेह बाहेर काढले.

शासनाकडून मयतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे ८.५० लक्ष रुपये देण्यात आले. विविध योजनांमधून मदत करण्यात आली. दुर्घटना घडल्यानंतर अडीच वर्षांत कायमस्वरूपी पुनर्वसन करून देण्यात आले. या नवीन गावात ६८ घरे बांधण्यात आली असून सर्व १२ मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या आहेत.

नवीन माळीणचा अजूनही कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटला नाही. गावात सर्व सुखसोई झाल्या. परंतु, पिण्याच्या पिण्याचा सर्वांत मोठा प्रश्न सात वर्षे उलटूनही सुटलेला नाही. उर्वरीत सर्व लोकांना घरे मिळावीत, स्मृतिस्तंभावर सावलीसाठी पत्र्याचे शेड व्हावे, हनुमान मंदिरासमोर सभामंडप व्हावा, अशा मागण्या प्रलंबित आहेत.

कोट

नवीन गावठाणात पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. विहीर घेतली आहे. पण, तिला दिवाळीनंतर पाणी राहत नाही. जानेवारीनंतर आम्हाला टॅंकरने पाणी पुरवठा होतो. यासाठी बुब्रा नदीत झालेल्या बंधाऱ्यात पाणी साठले तर विहिरीला पाणी मिळेल. तसेच विहिरीचे खोलीकरण झाल्यास, टाकी भरेल एवढे पाणी साठेल. नवीन गावठाणात एवढी एकच समस्या राहिली आहे.

- शिवाजी लेंभे, दुर्घटनाग्रस्त

कोट

नवीन गावठाणात फारशा काही समस्या नाहीत. फक्त पाणी व लाईटची समस्या आहे. डीपीला एकही दिवा नाही व एकही फ्यूज नाही. यावर्षी कोरोनामुळे जुन्या माळीण गावात होणारा स्मृतिदिन कार्यक्रम आम्ही साध्या पद्धतीने करणार आहोत.

गोविंद झांजरे, ग्रामस्थ

कोट

‘जोडीदारामुळे मी वाचलो’, मंगलदास विरणकने याने मला नदीचं पाणी पाहण्यासाठी म्हणून गावाच्या बाहेर नेलं, पाणी पाहून शाळेजवळ येवून बसलो. माझ्यासमोर संपूर्ण गावावर डोंगर कोसळला. गाव गाडताना डोळ्यानं पाहिलं, मंगलदासनं पाणी पाहायला नेलं नसतं तर मी पण गाडलो गेलो असतो.

- कमाजी पोटे, ग्रामस्थ

कोट

गाव गेलं त्यावर्षी एवढा पाऊस पडला नाही एवढा पाऊस यावर्षी झाला आहे. मात्र गावात नुकसान काही झाले नाही. घर सुंदर झालीत. पण काही ठिकाणी गळतात. आम्हीच घरांवर वॉटरप्रुफिंग करून घेतले आहे. त्यामुळे गळती होत नाही.

-गोविंद बुधा झांजरे, ग्रामस्थ

कोट

अतिशय सुंदर व कमी वेळात माळीणचे पुनर्वसन झाले. माळीणकरांना कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी दिलीप वळसे पाटील यांनी पायरडोह येथे मोठा तलाव बांधला आहे. या तलावातून माळीणला पाणी देण्याचे नियोजन असून यासाठी बुब्रा नदीवर बंधारेदेखील बांधण्यात आले आहेत.

- संजय गवारी, सभापती पंचायत समिती आंबेगाव

25072021-ॅँङ्म-ि06 - माळीण दुर्घटना

25072021-ॅँङ्म-ि07 - माळीण दुर्घटनेचे आत्ताचे ठिकाण

25072021-ॅँङ्म-ि08 - माळीणमधील घरे

25072021-ॅँङ्म-ि09 - माळीण दुर्घटनेत दगावलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेला स्मृतिस्तंभ

25072021-ॅँङ्म-ि10 - गोविंद झांजरे

25072021-ॅँङ्म-ि11 - शिवाजी लेंभे

25072021-ॅँङ्म-ि12 - कमाजी पोटे