शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

भोर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींत कोरोनाचा शिरकाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:11 IST

भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील बेड कमी पडणे तर ...

भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील बेड कमी पडणे तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. शासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. मात्र तरीही शहरात आणि ग्रामीण भागात दररोज कोरोना रुग्ण आढळत आहेत. ११३ जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे लोकांसह प्रशासनाची चिंता वाढताना दिसत आहे. शासकीय कोविड सेंटरसह खाजगी दवाखान्यातही कोविड सेंटर नवीन सुरू केले आहेत.

भोर तालुक्यातील १९६ गाव वाड्यावस्त्या आहेत. पैकी ७३ ग्रामपंचायतींत पुण्या मुंबई किंवा बाहेरून आलेले रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून, एक ते चारपर्यंत कोरोनाचा आकडा आहे. यातील अनेकजण उपचार घेऊन घरी आले आहेत. ७६ ग्रामपंचायतींत कोरोना झालेले नागरिक बरे होऊन घरी आल्यामुळे सदर गावात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तालुक्यातील नीरादेवघर धरणखोऱ्यातील हिर्डोशी भागातील पऱ्हर बुद्रुक, पऱ्हर खुर्द, शिरवली हि. मा., दुर्गाडी या गावांत तसेच भाटघर धरणपट्ट्यातील भुतोडे खोऱ्यातील करंदी खुर्द व करंदी बुद्रुक या दुर्गम डोंगरी भागातील ७ ग्रामपंचायतींत पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही लाटेत अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. सध्या बाहेरगावी असलेल्या लोकांमुळे गावे रिकामी आहेत. मात्र भविष्यात बाहेर असलेले नागरिक गावात परत येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नसलेल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची खरी गरज आहे.

--

कोट

कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या नागरिकांना गावात पुन्हा यायचे झाल्यास त्यांना प्रशासन व ग्रामपंचायतकडून कोरोना टेस्ट करुन शहरातील कोविड सेंटरला ठेवले जाणार आहे. यामुळे गावात नव्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. विशाल तनपुरे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भोर)

--

चौकट

--

दुर्गम डोंगरी गावे शहराचा संपर्क कमी, त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नाही

भोर तालुक्यातील भाटघर भागातील भुतोंडे खोरे व नीरादेवघर धरणभागातील तर हिर्डोशी भागातील लोकांचा आंबवडे भागातील काही गावे भोर शहरासी फारसा संपर्क नाही. कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक सहजासहजी गावाला येत नाहीत. यामुळे कोरोनाच्या दोन लाटेतही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र भविष्यात बाहेरचे नागरिक गावात यायला सुरवात झाल्यास आणि रिकामे गावे पुन्हा भरायला लागल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.