शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

भोर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींत कोरोनाचा शिरकाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:11 IST

भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील बेड कमी पडणे तर ...

भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील बेड कमी पडणे तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. शासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. मात्र तरीही शहरात आणि ग्रामीण भागात दररोज कोरोना रुग्ण आढळत आहेत. ११३ जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे लोकांसह प्रशासनाची चिंता वाढताना दिसत आहे. शासकीय कोविड सेंटरसह खाजगी दवाखान्यातही कोविड सेंटर नवीन सुरू केले आहेत.

भोर तालुक्यातील १९६ गाव वाड्यावस्त्या आहेत. पैकी ७३ ग्रामपंचायतींत पुण्या मुंबई किंवा बाहेरून आलेले रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून, एक ते चारपर्यंत कोरोनाचा आकडा आहे. यातील अनेकजण उपचार घेऊन घरी आले आहेत. ७६ ग्रामपंचायतींत कोरोना झालेले नागरिक बरे होऊन घरी आल्यामुळे सदर गावात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तालुक्यातील नीरादेवघर धरणखोऱ्यातील हिर्डोशी भागातील पऱ्हर बुद्रुक, पऱ्हर खुर्द, शिरवली हि. मा., दुर्गाडी या गावांत तसेच भाटघर धरणपट्ट्यातील भुतोडे खोऱ्यातील करंदी खुर्द व करंदी बुद्रुक या दुर्गम डोंगरी भागातील ७ ग्रामपंचायतींत पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही लाटेत अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. सध्या बाहेरगावी असलेल्या लोकांमुळे गावे रिकामी आहेत. मात्र भविष्यात बाहेर असलेले नागरिक गावात परत येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नसलेल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची खरी गरज आहे.

--

कोट

कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या नागरिकांना गावात पुन्हा यायचे झाल्यास त्यांना प्रशासन व ग्रामपंचायतकडून कोरोना टेस्ट करुन शहरातील कोविड सेंटरला ठेवले जाणार आहे. यामुळे गावात नव्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. विशाल तनपुरे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भोर)

--

चौकट

--

दुर्गम डोंगरी गावे शहराचा संपर्क कमी, त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नाही

भोर तालुक्यातील भाटघर भागातील भुतोंडे खोरे व नीरादेवघर धरणभागातील तर हिर्डोशी भागातील लोकांचा आंबवडे भागातील काही गावे भोर शहरासी फारसा संपर्क नाही. कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक सहजासहजी गावाला येत नाहीत. यामुळे कोरोनाच्या दोन लाटेतही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र भविष्यात बाहेरचे नागरिक गावात यायला सुरवात झाल्यास आणि रिकामे गावे पुन्हा भरायला लागल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.