शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बंदोबस्त चोख; पण गळतीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 8, 2016 03:25 IST

दौंड, इंदापूरला खडकवासला धरणातून पाणी सोडण्यासाठी पुणेकरांनी मोठा विरोध केला. यावर राजकारणही झाले. या विरोधाला न जुमानता पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी सोडण्याचा

पुणे : दौंड, इंदापूरला खडकवासला धरणातून पाणी सोडण्यासाठी पुणेकरांनी मोठा विरोध केला. यावर राजकारणही झाले. या विरोधाला न जुमानता पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पाणी चोरी रोखण्यासाठी गस्ती पथके तैनात करण्यात आली तसेच विद्युत पंपाचे वीजजोड तोडण्यात आले. मात्र, पाटबंधारे खात्याने खडकवासला कालव्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने यातून हजारो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत समोर आले आहे.दुष्काळी स्थितीमुळे दौंड, इंदापूर या तालुक्यांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे खडकवासला धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या दोन तालुक्यांसाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला पुण्यातील नागरिकांनी विरोध केला. सिंचन भवनात मनसे कार्यर्त्यांनी तोडफोड केली. या विरोधाला न जुमानता बुधवारी पाणी सोडण्यात आले. प्रत्येक जलसेतूमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. खडकवासला धरण ते इंदापूरदरम्यानच्या कालव्यावर ७८ जलसेतू असून, त्या प्रत्येकातून होणाऱ्या कमीजास्त गळतीची गणना केली, तर हे प्रमाण संभाव्य पाणीचोरीपेक्षा किती तरी पटींनी अधिक आहे. एकीकडे पाण्याची चोरी होऊ नये म्हणून वीजपुरवठा खंडित करायचा व गस्तीपथक नेमायचे, तर दुसरीकडे पाण्याची गळती होऊ नये म्हणून काळजी घ्यायची नाही. हा विरोधाभास असून त्यामुळे केवळ वीजपुरवठा नसल्याने नगदी पिकांना पाणी देता येत नाही, हा आपल्यांवर अन्याय होत आहे, असा आरोप कालवा परिसरातील शेतक-यांनी केला आहे.कोणावर गुन्हे दाखल करणार ?खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे फक्त पिण्यासाठी राखीव असल्याचा कांगावा करण्यात आला. पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तसेच शासकीय अधिकारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, अशा प्रकारे पाणी वाया जाण्याऐवजी शेतीला गेले असते, तर काय बिघडले असते? किंवा एखाद्या शेतकऱ्याने पाणी चोरले तर त्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. मात्र, अशा प्रकारे वितरिकेच्या नादुरुस्तीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले, आता कोणावर गुन्हे दाखल होणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत.1पाणीचोरी होऊ नये, यासाठी पाटबंधारे अधिकारी आणि खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांनी पोलिसांच्या उपस्थितीत बैठक घेतली. पाणी चोरणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके तसेच गस्ती पथके तैनात करण्या आली. कालव्यामधून वाहणाऱ्या पाण्याच्या संरक्षणासाठी कालव्यावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या २०२ किलोमीटर अंतरावरील कालव्यावर सशस्त्र कमांडो पथके, तब्बल २०० पोलीस व ५ पोलीस आधिकारी तैनात केले आहेत. 2बंदोबस्त असल्याने शेतकरी पाणी उचलण्याचे धाडस करीत नाहीत; परंतु पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे खात्याने कालव्यावर असलेल्या जलसेतूंची दुरुस्ती केलेली नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे उन्हाळ्यात कोरडे पडलेले दुथडी भरून वाहत आहेत.3या आवर्तनाद्वारे १३ मेपर्यंत सुरू राहणाऱ्या दौंड, इंदापूर या तालुक्यांतील जलस्रोत भरण्यात येणार आहेत. चोख बंदोबस्तामुळे पाणी कोणी चोरणार नाही; पण गळतीमुळे मात्र हजारो लिटर पाणी ऐन दुष्काळात वाया जात आहे. कालवा दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळतो, त्यानुसार प्राधान्याने गळतीच्या ठिकाणांची दुरुस्ती करण्यात येते. पाणी सोडल्यावरच गळतीचे ठिकाण कळते. शासनाकडून निधी आल्यानंतर प्राधान्याने कालव्याची दुरुस्ती करण्यात येईल.- बी. बी. लोहार मुख्य कार्यकारी खडकवासला पाटबंधारे विभाग