शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

जनतेच्या रेट्यामुळे निघाला तोडगा

By admin | Updated: March 13, 2016 01:02 IST

राज्यभरातील बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणार असून, या प्रश्नाचे गांभीर्य पिंपरी-चिंचवडच्या जनतेने राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले

पिंपरी : राज्यभरातील बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणार असून, या प्रश्नाचे गांभीर्य पिंपरी-चिंचवडच्या जनतेने राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले. यामध्ये कसलाही श्रेयवाद नसून, बेकायदा बांधकामे नियमितीकरणाचे सर्व श्रेय हे पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचे आहे. बांधकामे नियमितीकरणाचा घेतलेला निर्णय हा जनतेचा विजय असून, जनतेच्या रेट्यामुळे अनधिकृत बांधकामावर तोडगा निघाला, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत निवेदन सादर केले आहे. हा राज्यातील सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देणारा निर्णय आहे. शहरातील अनधिकृत बांधकामधारकांनी सुरू केलेल्या लढ्यात विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण यासह विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. सामान्य जनतेच्या या लढ्याला यश आले असल्याचे ते म्हणाले. अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी कशा प्रकारे नियमावली तयार केली व दंडात्मक रक्कम किती असेल, एफएसआय किती असेल, याबाबत राज्य शासनाचा अध्यादेश निघाल्यानंतरच नेमकी स्थिती समोर येणार असल्याचेही बारणे म्हणाले. या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेत्या सुलभा उबाळे, नंदकुमार सातुर्डेकर, भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रेड झोन, प्राधिकरणातील बांधकामांबाबत निर्णय घ्यावा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या निर्णयाचा लाभ चाळीस ते पन्नास टक्के अनधिकृत बांधकामांना मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, रेड झोन, पूररेषेतील आणि आरक्षणात झालेली बांधकामे, तसेच एमआयडीसीच्या जागेवर झालेली बांधकामेही शहरात मोठ्या प्रमाणावर आहेत. ही बांधकामे या निर्णयानुसार अधिकृत होणार नाहीत. त्यामुळे याबाबतही राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.- श्रीरंग बारणे, खासदार