शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

जनतेच्या रेट्यामुळे निघाला तोडगा

By admin | Updated: March 13, 2016 01:02 IST

राज्यभरातील बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणार असून, या प्रश्नाचे गांभीर्य पिंपरी-चिंचवडच्या जनतेने राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले

पिंपरी : राज्यभरातील बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणार असून, या प्रश्नाचे गांभीर्य पिंपरी-चिंचवडच्या जनतेने राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले. यामध्ये कसलाही श्रेयवाद नसून, बेकायदा बांधकामे नियमितीकरणाचे सर्व श्रेय हे पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचे आहे. बांधकामे नियमितीकरणाचा घेतलेला निर्णय हा जनतेचा विजय असून, जनतेच्या रेट्यामुळे अनधिकृत बांधकामावर तोडगा निघाला, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत निवेदन सादर केले आहे. हा राज्यातील सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देणारा निर्णय आहे. शहरातील अनधिकृत बांधकामधारकांनी सुरू केलेल्या लढ्यात विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण यासह विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. सामान्य जनतेच्या या लढ्याला यश आले असल्याचे ते म्हणाले. अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी कशा प्रकारे नियमावली तयार केली व दंडात्मक रक्कम किती असेल, एफएसआय किती असेल, याबाबत राज्य शासनाचा अध्यादेश निघाल्यानंतरच नेमकी स्थिती समोर येणार असल्याचेही बारणे म्हणाले. या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेत्या सुलभा उबाळे, नंदकुमार सातुर्डेकर, भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रेड झोन, प्राधिकरणातील बांधकामांबाबत निर्णय घ्यावा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या निर्णयाचा लाभ चाळीस ते पन्नास टक्के अनधिकृत बांधकामांना मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, रेड झोन, पूररेषेतील आणि आरक्षणात झालेली बांधकामे, तसेच एमआयडीसीच्या जागेवर झालेली बांधकामेही शहरात मोठ्या प्रमाणावर आहेत. ही बांधकामे या निर्णयानुसार अधिकृत होणार नाहीत. त्यामुळे याबाबतही राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.- श्रीरंग बारणे, खासदार