शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उद्योगांवर सेन्सर यंत्रणा बसविणार

By admin | Updated: January 8, 2016 01:43 IST

गेल्या ६८ वर्षांपासून नद्यांमध्ये सुधारणा होण्याऐवजी त्यात ८६ टक्के प्रक्रिया न झालेले मैलापाणी सोडण्यात येत आहे. त्यात शेतातील रासायनिक खते,

पुणे : गेल्या ६८ वर्षांपासून नद्यांमध्ये सुधारणा होण्याऐवजी त्यात ८६ टक्के प्रक्रिया न झालेले मैलापाणी सोडण्यात येत आहे. त्यात शेतातील रासायनिक खते, कीटकनाशकयुक्त पाणी, औद्योगिकीकरणातूनही सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे उद्योगांवर चिमण्यांवर आणि सांडपाणी सोडण्याच्या यंत्रणेवर सेन्सर यंत्रणा बसवून मानकांपेक्षा जास्त वायू किंवा जलप्रदूषण झाल्यास थेट प्रदूषण महामंडळालाच त्याचा संदेश जाईल, अशी यंत्रणा बसविली जाणार आहे. देशात १,८०० उद्योगांवर अशी यंत्रणा बसविण्यात आली असून, ती यशस्वी ठरत असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.दहाव्या किलोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आले. या वेळी आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ते जॉन बोमन, अध्यक्ष माधव चंद्रचूड, निमंत्रक आरती किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. या वेळी पर्यावरण क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. माळढोक पक्ष्यांसाठी काम करणारे डॉ. प्रमोद पाटील, नद्यांसाठी काम करणारे सागर यादवाडकर, हत्तींच्या संरक्षणासाठी झटणारे आनंद कुमार आणि गीर येथील द लायन्स क्वीन्स आॅफ इंडियाच्या रसिलाबेन वाधेर यांचा सन्मान झाला. वाईल्डलाईफ छायाचित्र व निसर्गावर बेतलेल्या चित्रपटविजेत्यांचाही सन्मान झाला.