शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

गावागावांत पर्जन्यमापक बसविणार

By admin | Updated: May 28, 2016 04:18 IST

सध्या जिल्हात मंडलावर आधारित पाऊस मोजला जातो. त्यामुळे आणेवारीत फरक पडत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने गावागावांत पर्जन्यमापक यंत्रणा

पुणे : सध्या जिल्हात मंडलावर आधारित पाऊस मोजला जातो. त्यामुळे आणेवारीत फरक पडत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने गावागावांत पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याच्या विचारात आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले. हवेली तालुका खरीप हंगाम टंचाई बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेत शरदचंद्र सभागृहात गुरुवारी ही बैैठक झाली. सध्या काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. आणेवारीवर आधारित शासन ती जाहीर करते. आणेवारी त्या गावात पाऊसमान किती झाला यावर ठरविली जाते. मात्र, जिल्ह्यात पाऊस मोजण्याची यंत्रणा सक्षम नाही. मंडलावर असलेल्या यंत्रणेतून पाऊस गृहीत धरला जातो. त्यामुळे काही गावांत कमी पाऊस पडला व जिथे यंत्रणा आहे तेथे जास्त पाऊस पडला, तर हाच पाऊस त्या गावाला लागू होतो. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद प्रत्येक गावात पर्जन्यमापक बसविण्याच्या विचारात आहे. पुरवणी बजेटच्या अगोदर जर यासाठी किती निधी लागू शकतो हे समजले तर निधी ठेवता येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याचे इस्टिमेट तयार करावे, असे आवाहन कंद यांनी या वेळी केले. या बैैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई, महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुनील खैरनार, हवेली पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)हवेली तालुक्यात १ लाख वृक्षलागवड करणारयंदा शासनाने २ कोटी वृक्षलागवड करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात १ लाखापेक्षा अधिक वृक्षलागवड करून जिल्ह्यात आमचा तालुका पहिल्या क्रमांकावर राहील, असे आश्वासन या वेळी कंद यांनी हवेलीकरांच्या वतीने दिले. त्यांनी उपस्थितांना आवाहन करीत तालुक्यात सर्वाधिक वृक्ष लागले पाहिजेत, एकही सरकारी जागा शिल्लक राहता कामा नये, ग्रामसेवकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे सांगितले. आता रब्बी हंगामापूर्वीच कृषी मेळावेदरवर्षी जिल्ह्यात मार्चअखेर कृषी मेळावे घेतले जातात. मात्र आता रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी तेही प्रत्येक तालुक्यात कृषी मेळावे घेतले जातील. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाईल, असेही कंद यांनी सांगितले. पावतीचा आग्रह धराबी बियाणे, खते दुकानातून घेताना शेतकऱ्यांनी पावतीचा आग्रह धरावा. पुढे बियाणांची तक्रार होते, तेव्हा पावती गरजेची असते, असे कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी आवाहन केले. दुकानदारांनी हलगर्जीपणा करू नये, तसे आढळल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, असेही त्यांनी सांगितले.