शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

नाशिकची निवड; अन्यथा संमेलनच रद्द?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:10 IST

महामंडळ अध्यक्षांचा हेकेखोरपणा : केवळ एकाच स्थळाची होणार पाहणी अध्यक्षांची भूमिका : ‘संमेलन इतरत्र कोठेही घेऊ, पण दिल्ली नको’ ...

महामंडळ अध्यक्षांचा हेकेखोरपणा : केवळ एकाच स्थळाची होणार पाहणी

अध्यक्षांची भूमिका : ‘संमेलन इतरत्र कोठेही घेऊ, पण दिल्ली नको’ असा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘संमेलन इतरत्र कोठेही घेऊ, पण दिल्ली नको’ असा सूर आळवत महामंडळ अध्यक्षांनी सुरुवातीपासूनच दिल्लीत संमेलन घेण्यास विरोध केला. त्यामुळे नाशिकलाच संमेलन घ्यायचे, अशा हट्टाला पेटत लोकहितवादी मंडळाकडून ऐन वेळी निमंत्रण मागवून घेतल्याचेही बोलले जात आहे. आगामी संमेलन नाशिकलाच घ्यायचे आणि ते शक्य नसल्यास संमेलनच रद्द करायचे, अशी भूमिकाही अध्यक्षांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी औरंगाबाद येथील कार्यालयात पार पडली. बैठकीत संमेलनस्थळ निवड समिती सदस्यांची निवड केली. ही समिती नाशिक येथे स्थळ निवडीसाठी ७ जानेवारी रोजी भेट देणार आहे. केवळ तीन ठिकाणची निमंत्रणे आलेली असताना स्थळ समितीकडून केवळ नाशिकचीच पाहणी केली जाणार आहे. संमेलनस्थळ आधीच ठरलेले असताना स्थळ निवड समितीचे सोपस्कार तरी कशासाठी, असा प्रश्न साहित्य वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, ८ जानेवारी रोजी स्थळ निवड समितीची बैठक औरंगाबाद येथे होणार आहे. ३ जानेवारी रोजी झालेल्या बैैठकीत महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मुंबई साहित्य संघानेही दिल्लीला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. इतर पदाधिकाऱ्यांचे मत विचारात न घेता महामंडळ अध्यक्षांची एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने महामंडळ अध्यक्षांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

---

टकले, भुजबळ यांनी दिल्लीला पाठिंबा द्यावा : संजय नहार

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत एकदाही संमेलन झालेले नाही. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे दिल्लीत संमेलन घेण्याच्या निर्णयास महामंडळ अध्यक्षांसह हेमंत टकले, छगन भुजबळ यांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी केले आहे. ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या ओळींप्रमाणे मराठी भाषेच्या अभिजात दर्जापासून अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, याकडेही नहार यांनी लक्ष वेधले.