शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

नाशिकची निवड; अन्यथा संमेलनच रद्द?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:10 IST

महामंडळ अध्यक्षांचा हेकेखोरपणा : केवळ एकाच स्थळाची होणार पाहणी अध्यक्षांची भूमिका : ‘संमेलन इतरत्र कोठेही घेऊ, पण दिल्ली नको’ ...

महामंडळ अध्यक्षांचा हेकेखोरपणा : केवळ एकाच स्थळाची होणार पाहणी

अध्यक्षांची भूमिका : ‘संमेलन इतरत्र कोठेही घेऊ, पण दिल्ली नको’ असा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘संमेलन इतरत्र कोठेही घेऊ, पण दिल्ली नको’ असा सूर आळवत महामंडळ अध्यक्षांनी सुरुवातीपासूनच दिल्लीत संमेलन घेण्यास विरोध केला. त्यामुळे नाशिकलाच संमेलन घ्यायचे, अशा हट्टाला पेटत लोकहितवादी मंडळाकडून ऐन वेळी निमंत्रण मागवून घेतल्याचेही बोलले जात आहे. आगामी संमेलन नाशिकलाच घ्यायचे आणि ते शक्य नसल्यास संमेलनच रद्द करायचे, अशी भूमिकाही अध्यक्षांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी औरंगाबाद येथील कार्यालयात पार पडली. बैठकीत संमेलनस्थळ निवड समिती सदस्यांची निवड केली. ही समिती नाशिक येथे स्थळ निवडीसाठी ७ जानेवारी रोजी भेट देणार आहे. केवळ तीन ठिकाणची निमंत्रणे आलेली असताना स्थळ समितीकडून केवळ नाशिकचीच पाहणी केली जाणार आहे. संमेलनस्थळ आधीच ठरलेले असताना स्थळ निवड समितीचे सोपस्कार तरी कशासाठी, असा प्रश्न साहित्य वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, ८ जानेवारी रोजी स्थळ निवड समितीची बैठक औरंगाबाद येथे होणार आहे. ३ जानेवारी रोजी झालेल्या बैैठकीत महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मुंबई साहित्य संघानेही दिल्लीला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. इतर पदाधिकाऱ्यांचे मत विचारात न घेता महामंडळ अध्यक्षांची एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने महामंडळ अध्यक्षांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

---

टकले, भुजबळ यांनी दिल्लीला पाठिंबा द्यावा : संजय नहार

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत एकदाही संमेलन झालेले नाही. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे दिल्लीत संमेलन घेण्याच्या निर्णयास महामंडळ अध्यक्षांसह हेमंत टकले, छगन भुजबळ यांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी केले आहे. ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या ओळींप्रमाणे मराठी भाषेच्या अभिजात दर्जापासून अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, याकडेही नहार यांनी लक्ष वेधले.