शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

घटनांचे गांभीर्य पाहून ‘त्या’ गावांचा पुनर्वसनाचा निर्णय : दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

पुणे : आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन करायचे म्हटल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होतो. ते दुसरीकडे जाण्यास तयार होत नाहीत. ...

पुणे : आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन करायचे म्हटल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होतो. ते दुसरीकडे जाण्यास तयार होत नाहीत. त्यामध्ये या घटना घडतात. त्या घटनांचे गांभीर्य किती आहे हे पाहून पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेगावमधील पाच गावे धोकादायक म्हणून घोषित झाली आहेत. या पाचही गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावे अशी ग्रामस्थांची पाच वर्षांपासून मागणी आहे. बैठका पार पडल्या, जागांचे सर्वेक्षण झाले, पण पुनर्वसनाला मुहूर्त लागलेला नाही. मात्र वळसे पाटील यांनी धोकादायक गावांचे पुनर्वसन करायचे म्हटल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होत असल्याचे सांगत घटनांचे गांभीर्य पाहून पुनर्वसनाचा निर्णय घेऊ असे सांगत प्रश्न टोलवला.

ते म्हणाले, दरडी कोसळण्याबाबत नियोजन करायला हवे ते होत नाही. दरडप्रवण भागाचा अभ्यास सरकारकडे असतो. परंतु रायगड जिल्हयातील गावात जी दरड कोसळ्ण्याची घटना घडली, तो भाग दरडप्रवण नव्हता. तरीसुद्धा दरड कोसळून जीवितहानी झाली. माळीण संदर्भात पुनर्वसनाची जी भूमिका घेऊन नवीन गाव वसविण्यात आली. तशाच प्रकारची भूमिका गृहनिर्माणमंत्र्यांनी घेतली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्ह्यातील गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ समितीने पुढील काळात या घटना होत राहाणार आहेत, असे सांगितले होते. यावर वळसे पाटील म्हणाले, डॉ. माधव गाडगीळ यांचा अहवाल का स्वीकारला गेला नाही हे माहिती नाही. या ज्या नैसर्गिक घटना घडत आहेत. त्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून नियोजन करायला पाहिजे होते. राज्यस्तरावर कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापनाची टीम कार्यरत आहेच, पण अशा घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन सुरू होण्याच्या ऐवजी या घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे हे जास्त महत्वाचे राहील.

-------------------

‘पेगँसेस’ ची वस्तुस्थिती तपासण्याचा प्रयत्न सुरू

पेगँसेस चे महाराष्ट्र कनेकशन समोर येत आहे. खत कंपन्यांवर हेरीगिरी करण्यासाठी या यंत्रणेचा वापर झाला. या पार्श्वभूमीवर ‘पेगँसेस’प्रकरणाच्या महाराष्ट्रातील तपासाविषयी सांगताना ‘हा केवळ एका राज्यापुरता प्रश्न मर्यादित नाही. संपूर्ण जगाला त्याची बाधा झाली आहे. महाराष्ट्र सरकारने त्याची वस्तुस्थिती तपासण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

-----------------

पोनोग्राफी’ला आळा बसण्यासाठी प्रयत्न करणार

‘पोनोग्राफी’ला आळा हा विषय समाजामध्ये निषिद्ध आहे. त्यात कुणी चुकीचे वागत असेल तर पोलिसांनी त्याविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई एका केसेपुरतीच मर्यादित राहाणार नाही. तर त्याला कसे थांबविता येईल, त्यातून मार्ग कसा काढता येईल याबाबत आमचे प्रयत्न सुरू राहाणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

---------------