शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

घटनांचे गांभीर्य पाहून ‘त्या’ गावांचा पुनर्वसनाचा निर्णय : दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

पुणे : आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन करायचे म्हटल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होतो. ते दुसरीकडे जाण्यास तयार होत नाहीत. ...

पुणे : आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन करायचे म्हटल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होतो. ते दुसरीकडे जाण्यास तयार होत नाहीत. त्यामध्ये या घटना घडतात. त्या घटनांचे गांभीर्य किती आहे हे पाहून पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेगावमधील पाच गावे धोकादायक म्हणून घोषित झाली आहेत. या पाचही गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावे अशी ग्रामस्थांची पाच वर्षांपासून मागणी आहे. बैठका पार पडल्या, जागांचे सर्वेक्षण झाले, पण पुनर्वसनाला मुहूर्त लागलेला नाही. मात्र वळसे पाटील यांनी धोकादायक गावांचे पुनर्वसन करायचे म्हटल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होत असल्याचे सांगत घटनांचे गांभीर्य पाहून पुनर्वसनाचा निर्णय घेऊ असे सांगत प्रश्न टोलवला.

ते म्हणाले, दरडी कोसळण्याबाबत नियोजन करायला हवे ते होत नाही. दरडप्रवण भागाचा अभ्यास सरकारकडे असतो. परंतु रायगड जिल्हयातील गावात जी दरड कोसळ्ण्याची घटना घडली, तो भाग दरडप्रवण नव्हता. तरीसुद्धा दरड कोसळून जीवितहानी झाली. माळीण संदर्भात पुनर्वसनाची जी भूमिका घेऊन नवीन गाव वसविण्यात आली. तशाच प्रकारची भूमिका गृहनिर्माणमंत्र्यांनी घेतली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्ह्यातील गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ समितीने पुढील काळात या घटना होत राहाणार आहेत, असे सांगितले होते. यावर वळसे पाटील म्हणाले, डॉ. माधव गाडगीळ यांचा अहवाल का स्वीकारला गेला नाही हे माहिती नाही. या ज्या नैसर्गिक घटना घडत आहेत. त्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून नियोजन करायला पाहिजे होते. राज्यस्तरावर कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापनाची टीम कार्यरत आहेच, पण अशा घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन सुरू होण्याच्या ऐवजी या घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे हे जास्त महत्वाचे राहील.

-------------------

‘पेगँसेस’ ची वस्तुस्थिती तपासण्याचा प्रयत्न सुरू

पेगँसेस चे महाराष्ट्र कनेकशन समोर येत आहे. खत कंपन्यांवर हेरीगिरी करण्यासाठी या यंत्रणेचा वापर झाला. या पार्श्वभूमीवर ‘पेगँसेस’प्रकरणाच्या महाराष्ट्रातील तपासाविषयी सांगताना ‘हा केवळ एका राज्यापुरता प्रश्न मर्यादित नाही. संपूर्ण जगाला त्याची बाधा झाली आहे. महाराष्ट्र सरकारने त्याची वस्तुस्थिती तपासण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

-----------------

पोनोग्राफी’ला आळा बसण्यासाठी प्रयत्न करणार

‘पोनोग्राफी’ला आळा हा विषय समाजामध्ये निषिद्ध आहे. त्यात कुणी चुकीचे वागत असेल तर पोलिसांनी त्याविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई एका केसेपुरतीच मर्यादित राहाणार नाही. तर त्याला कसे थांबविता येईल, त्यातून मार्ग कसा काढता येईल याबाबत आमचे प्रयत्न सुरू राहाणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

---------------