शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

घटनांचे गांभीर्य पाहून ‘त्या’ गावांचा पुनर्वसनाचा निर्णय : दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

पुणे : आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन करायचे म्हटल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होतो. ते दुसरीकडे जाण्यास तयार होत नाहीत. ...

पुणे : आंबेगाव तालुक्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन करायचे म्हटल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होतो. ते दुसरीकडे जाण्यास तयार होत नाहीत. त्यामध्ये या घटना घडतात. त्या घटनांचे गांभीर्य किती आहे हे पाहून पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेगावमधील पाच गावे धोकादायक म्हणून घोषित झाली आहेत. या पाचही गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावे अशी ग्रामस्थांची पाच वर्षांपासून मागणी आहे. बैठका पार पडल्या, जागांचे सर्वेक्षण झाले, पण पुनर्वसनाला मुहूर्त लागलेला नाही. मात्र वळसे पाटील यांनी धोकादायक गावांचे पुनर्वसन करायचे म्हटल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होत असल्याचे सांगत घटनांचे गांभीर्य पाहून पुनर्वसनाचा निर्णय घेऊ असे सांगत प्रश्न टोलवला.

ते म्हणाले, दरडी कोसळण्याबाबत नियोजन करायला हवे ते होत नाही. दरडप्रवण भागाचा अभ्यास सरकारकडे असतो. परंतु रायगड जिल्हयातील गावात जी दरड कोसळ्ण्याची घटना घडली, तो भाग दरडप्रवण नव्हता. तरीसुद्धा दरड कोसळून जीवितहानी झाली. माळीण संदर्भात पुनर्वसनाची जी भूमिका घेऊन नवीन गाव वसविण्यात आली. तशाच प्रकारची भूमिका गृहनिर्माणमंत्र्यांनी घेतली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्ह्यातील गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ समितीने पुढील काळात या घटना होत राहाणार आहेत, असे सांगितले होते. यावर वळसे पाटील म्हणाले, डॉ. माधव गाडगीळ यांचा अहवाल का स्वीकारला गेला नाही हे माहिती नाही. या ज्या नैसर्गिक घटना घडत आहेत. त्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून नियोजन करायला पाहिजे होते. राज्यस्तरावर कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापनाची टीम कार्यरत आहेच, पण अशा घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन सुरू होण्याच्या ऐवजी या घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे हे जास्त महत्वाचे राहील.

-------------------

‘पेगँसेस’ ची वस्तुस्थिती तपासण्याचा प्रयत्न सुरू

पेगँसेस चे महाराष्ट्र कनेकशन समोर येत आहे. खत कंपन्यांवर हेरीगिरी करण्यासाठी या यंत्रणेचा वापर झाला. या पार्श्वभूमीवर ‘पेगँसेस’प्रकरणाच्या महाराष्ट्रातील तपासाविषयी सांगताना ‘हा केवळ एका राज्यापुरता प्रश्न मर्यादित नाही. संपूर्ण जगाला त्याची बाधा झाली आहे. महाराष्ट्र सरकारने त्याची वस्तुस्थिती तपासण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

-----------------

पोनोग्राफी’ला आळा बसण्यासाठी प्रयत्न करणार

‘पोनोग्राफी’ला आळा हा विषय समाजामध्ये निषिद्ध आहे. त्यात कुणी चुकीचे वागत असेल तर पोलिसांनी त्याविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई एका केसेपुरतीच मर्यादित राहाणार नाही. तर त्याला कसे थांबविता येईल, त्यातून मार्ग कसा काढता येईल याबाबत आमचे प्रयत्न सुरू राहाणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

---------------