शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
3
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
4
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
5
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
6
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
7
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
8
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
9
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
10
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
11
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
12
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
13
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
14
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
15
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
16
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
17
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
18
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
19
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
20
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
Daily Top 2Weekly Top 5

वैभवशाली इतिहास होणार नजरेआड

By admin | Updated: December 31, 2014 00:28 IST

सातशे वर्षांपूर्वीचा पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनाचा ताबा महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सोडण्याचा निर्णय निनाद संस्थेने घेतला आहे.

पुणे : पुनवडी ते पुणे, पेठा कशा वसल्या, शनिवार वाड्यावर युनियन जॅक कसा फडकला, पोस्ट आॅफिस सुरू, पानिपत युद्धानंतर सैनिकांसाठी बांधण्यात आलेला लाकडी पूल, पूर्वी कात्रज तलावापासून शनिवार वाड्यापर्यंत पुणे शहराला पाणी पुरवठा कसा होत असे, अशा पद्धतीने सातशे वर्षांपूर्वीचा पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनाचा ताबा महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सोडण्याचा निर्णय निनाद संस्थेने घेतला आहे. आज (बुधवारी) हे प्रदर्शन संस्थेकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. बारा वर्षांपूर्वी निनाद संस्थेचे उदय जोशी यांच्याकडे पुण्याची ओळख सांगणाऱ्या या प्रदर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु हा एका तपाचा करार गेल्या वर्षी पूर्ण होऊनदेखील पालिकेने हे प्रदर्शन ताब्यात घेण्याचे किंवा कराराची मुदत वाढविण्यासंबंधीही अद्याप कोणतीच पावले उचलली नाहीत. तरीही पुण्याचे हे वैभव पर्यटकांना पाहता यावे या विचाराने जोशी यांनी पालिकेकडून काहीही अपेक्षा न बाळगता हे प्रदर्शन खुले ठेवले, ते केवळ पुणेकरांसाठी.शहराच्या पर्यटनविषयक उपक्रमात विश्रामबाग वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूला स्थान देण्यात आलेले नाही. ही त्यातील अजून दुर्दैवी बाब आहे. या वास्तूला भेट द्यायची तर वाहन लावायचे कुठे हा मोठा प्रश्न पुणेकरांना भेडसावत असल्यामुळेच प्रदर्शनाकडेच पाठ फिरविली जात आहे. (प्रतिनिधी)दैनंदिन खर्च सांभाळताना होतेय दमछाकया ठिकाणी दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या फक्त १५ ते २० इतकी आहे. अनेक वर्षे तिकिट दर हे तीन रूपयेच आहेत. त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या परिस्थितीत येथील कर्मचाऱ्यांचा पगार, देखभाल खर्च सांभाळताना दमछाक होत असल्याचे नगरसेवक उदय जोशी यांनी सांगितले.पुणे हे सांस्कृतिक शहर असून, ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. खास या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातील असंख्य पर्यटक शहराकडे आकर्षित होतात. परंतु या शहराचा इतिहास सांगणाऱ्या चांगल्या प्रदर्शनाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज ज्या भावनेने हे पुण्याचे इतिहास सांगणारे प्रदर्शन मी व माझी पत्नी शुभदा जोशी हिने सर्वस्व लावून उभे केले, ते प्रदर्शन पालिकेकडे सोपविताना दु:ख होत असले तरी ते धूळ खात राहण्यापेक्षा पालिकेने त्याची जबाबदारी दुसऱ्या व्यवस्थापनाकडे सोपविली तर आनंदच आहे. परंतु यानिमित्ताने पुण्याची संस्कृती कशी लोप होत चालली आहे याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे.- उदय जोशी