शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

वैभवशाली इतिहास होणार नजरेआड

By admin | Updated: December 31, 2014 00:28 IST

सातशे वर्षांपूर्वीचा पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनाचा ताबा महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सोडण्याचा निर्णय निनाद संस्थेने घेतला आहे.

पुणे : पुनवडी ते पुणे, पेठा कशा वसल्या, शनिवार वाड्यावर युनियन जॅक कसा फडकला, पोस्ट आॅफिस सुरू, पानिपत युद्धानंतर सैनिकांसाठी बांधण्यात आलेला लाकडी पूल, पूर्वी कात्रज तलावापासून शनिवार वाड्यापर्यंत पुणे शहराला पाणी पुरवठा कसा होत असे, अशा पद्धतीने सातशे वर्षांपूर्वीचा पुण्याचा इतिहास सांगणाऱ्या ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ या प्रदर्शनाचा ताबा महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे सोडण्याचा निर्णय निनाद संस्थेने घेतला आहे. आज (बुधवारी) हे प्रदर्शन संस्थेकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. बारा वर्षांपूर्वी निनाद संस्थेचे उदय जोशी यांच्याकडे पुण्याची ओळख सांगणाऱ्या या प्रदर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु हा एका तपाचा करार गेल्या वर्षी पूर्ण होऊनदेखील पालिकेने हे प्रदर्शन ताब्यात घेण्याचे किंवा कराराची मुदत वाढविण्यासंबंधीही अद्याप कोणतीच पावले उचलली नाहीत. तरीही पुण्याचे हे वैभव पर्यटकांना पाहता यावे या विचाराने जोशी यांनी पालिकेकडून काहीही अपेक्षा न बाळगता हे प्रदर्शन खुले ठेवले, ते केवळ पुणेकरांसाठी.शहराच्या पर्यटनविषयक उपक्रमात विश्रामबाग वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूला स्थान देण्यात आलेले नाही. ही त्यातील अजून दुर्दैवी बाब आहे. या वास्तूला भेट द्यायची तर वाहन लावायचे कुठे हा मोठा प्रश्न पुणेकरांना भेडसावत असल्यामुळेच प्रदर्शनाकडेच पाठ फिरविली जात आहे. (प्रतिनिधी)दैनंदिन खर्च सांभाळताना होतेय दमछाकया ठिकाणी दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या फक्त १५ ते २० इतकी आहे. अनेक वर्षे तिकिट दर हे तीन रूपयेच आहेत. त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या परिस्थितीत येथील कर्मचाऱ्यांचा पगार, देखभाल खर्च सांभाळताना दमछाक होत असल्याचे नगरसेवक उदय जोशी यांनी सांगितले.पुणे हे सांस्कृतिक शहर असून, ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. खास या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातील असंख्य पर्यटक शहराकडे आकर्षित होतात. परंतु या शहराचा इतिहास सांगणाऱ्या चांगल्या प्रदर्शनाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज ज्या भावनेने हे पुण्याचे इतिहास सांगणारे प्रदर्शन मी व माझी पत्नी शुभदा जोशी हिने सर्वस्व लावून उभे केले, ते प्रदर्शन पालिकेकडे सोपविताना दु:ख होत असले तरी ते धूळ खात राहण्यापेक्षा पालिकेने त्याची जबाबदारी दुसऱ्या व्यवस्थापनाकडे सोपविली तर आनंदच आहे. परंतु यानिमित्ताने पुण्याची संस्कृती कशी लोप होत चालली आहे याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे.- उदय जोशी