शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

धर्मनिरपेक्षता आयात केलेली नाही

By admin | Updated: March 24, 2017 04:20 IST

‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द पाश्चात्त्य विचारसरणीतून आला आहे, हा समज चुकीचा आहे.

पुणे : ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द पाश्चात्त्य विचारसरणीतून आला आहे, हा समज चुकीचा आहे. साडेतीन हजार वर्षांपूर्वी ॠग्वेदात धर्मनिरपेक्षतेसाठी ‘बहुविविधता’ हा शब्द रूढ होता, भारतीय संस्कृतीतच या शब्दाची मूळं रुजलेली आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही हे शब्द आपण कुठूनही आयात केलेले नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे माजी खासदार आणि पुरोगामी विचारवंत आरिफ महंमद खान यांनी धर्माचे राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त अल्मास शेख, तबस्सुम इनामदार, शमीम मडकी, सायराबानो शेख, दिलशाद मुजावर यांचा सत्यशोधक फातिमाबी शेख स्मृतिगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार राज काझी यांना स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी खान बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर फॉर प्रमोशन आॅफ डेमॉक्रसी अँड सेक्युलॅरिझमचे अध्यक्ष प्रा. जहीर अली, भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापिका जाकिया सोमण, स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. नूर जहीर, प्रा. शमशुद्दीन तांबोळी उपस्थित होते. आरिफ खान म्हणाले, कुराणात ‘अवामून’ या शब्दाचा अर्थ हा समानतेशीच निगडित आहे, मात्र कुराणात स्त्री आणि पुरुष दोघांच्या भूमिका निश्चित केलेल्या आहेत. तिची जबाबदारी ही घर चालविणे नाही, तर ती पुरुषांचीच आहे. सीमेवर लढायला महिलांना पाठवणार का? पण महिला पायलट विमानातून बाँब नक्कीच फेकू शकतात. ही असमानता मानली जाणार का? प्रत्येक धर्म आपली विचारसरणी पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुस्तकाच्या माध्यमातून ती मांडली तर बिघडले कुठे? अशी दुटप्पी वृत्ती असू नये. राजकारण्यांना नागरिकांची मते नको आहेत तर समाजाची मते हवी आहेत. कारण नागरिकांची मते मिळवण्यासाठी काम लागते. धर्माची मते मिळविण्यासाठी केवळ भीती निर्माण करावी लागते. शहाबानो प्रकरणात सांप्रदायिकतेला सन्मान मिळाल्यानेच मी खासदारकीचा राजीनामा दिली असल्याची टिप्पणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)