शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्षता आयात केलेली नाही

By admin | Updated: March 24, 2017 04:20 IST

‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द पाश्चात्त्य विचारसरणीतून आला आहे, हा समज चुकीचा आहे.

पुणे : ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द पाश्चात्त्य विचारसरणीतून आला आहे, हा समज चुकीचा आहे. साडेतीन हजार वर्षांपूर्वी ॠग्वेदात धर्मनिरपेक्षतेसाठी ‘बहुविविधता’ हा शब्द रूढ होता, भारतीय संस्कृतीतच या शब्दाची मूळं रुजलेली आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही हे शब्द आपण कुठूनही आयात केलेले नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे माजी खासदार आणि पुरोगामी विचारवंत आरिफ महंमद खान यांनी धर्माचे राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त अल्मास शेख, तबस्सुम इनामदार, शमीम मडकी, सायराबानो शेख, दिलशाद मुजावर यांचा सत्यशोधक फातिमाबी शेख स्मृतिगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार राज काझी यांना स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी खान बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर फॉर प्रमोशन आॅफ डेमॉक्रसी अँड सेक्युलॅरिझमचे अध्यक्ष प्रा. जहीर अली, भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापिका जाकिया सोमण, स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. नूर जहीर, प्रा. शमशुद्दीन तांबोळी उपस्थित होते. आरिफ खान म्हणाले, कुराणात ‘अवामून’ या शब्दाचा अर्थ हा समानतेशीच निगडित आहे, मात्र कुराणात स्त्री आणि पुरुष दोघांच्या भूमिका निश्चित केलेल्या आहेत. तिची जबाबदारी ही घर चालविणे नाही, तर ती पुरुषांचीच आहे. सीमेवर लढायला महिलांना पाठवणार का? पण महिला पायलट विमानातून बाँब नक्कीच फेकू शकतात. ही असमानता मानली जाणार का? प्रत्येक धर्म आपली विचारसरणी पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुस्तकाच्या माध्यमातून ती मांडली तर बिघडले कुठे? अशी दुटप्पी वृत्ती असू नये. राजकारण्यांना नागरिकांची मते नको आहेत तर समाजाची मते हवी आहेत. कारण नागरिकांची मते मिळवण्यासाठी काम लागते. धर्माची मते मिळविण्यासाठी केवळ भीती निर्माण करावी लागते. शहाबानो प्रकरणात सांप्रदायिकतेला सन्मान मिळाल्यानेच मी खासदारकीचा राजीनामा दिली असल्याची टिप्पणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)