शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण पिढी बनतेय टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:09 IST

आतापर्यंतच्या रुग्णसंख्येनुसार ३१ ते ४० वयोगटातील २१.१५ टक्के नागरिकांना, ४१ ते ५० वयोगटातील १८.२ टक्के, तर २१ ते ३० ...

आतापर्यंतच्या रुग्णसंख्येनुसार ३१ ते ४० वयोगटातील २१.१५ टक्के नागरिकांना, ४१ ते ५० वयोगटातील १८.२ टक्के, तर २१ ते ३० वयोगटातील १६.५४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तरुणांनी या लाटेत जास्त काळजी घेण्याची गरज डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांचा, विशेषतः तरुणांचा निष्काळजीपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मास्क न वापरणे, कामाशिवाय घोळक्याने गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे असे प्रकार वाढताना दिसत आहेत. एकमेकांशी संपर्क वाढल्याने संसर्गाचा वेगही वाढला आहे. तरुणांकडून कोरोनाचा संसर्ग घरातील ज्येष्ठ व्यक्तींना अथवा संपूर्ण कुटुंबाला होताना दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंबे पॉझिटिव्ह सापडत आहेत. तरुणांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने आणि दुसऱ्या लाटेत विषाणूची घातकता कमी झाल्याने तरुण पॉझिटिव्ह आले तरी त्यांच्यामध्ये फारशी लक्षणे नाहीत. तरुण क्वारंटाईन होऊन बरे होत आहेत. मात्र, त्यांच्यामुळे घरातील इतरांना कोरोनाचा गंभीर संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

------

कोरोनाचे राज्यातील एकूण रुग्ण - 2546322

वयोगट रुग्ण टक्केवारी

१० वर्षांखालील 81913 3.22

११ ते २० 168764 6.63

२१ ते ३० 421137 16.54

३१ ते ४० 538463 21.15

४१ ते ५० 458827 18.02

५१ ते ६० 412984 16.22

६१ ते ७० 283232 11.12

७१ ते ८० 16949 5.38

८१ ते ९० 39097 1.54

९१ ते १०० 4894 0.19

१०० च्या पुढे 62 0

------

मृत्यूंमध्ये ज्येष्ठ जास्त

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 9873 मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 6815 पुरुष तर 3057 स्त्रियांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू 61 ते 70 या वयोगटातील असून ती संख्या 2936 इतकी आहे.