शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

डिंभेतून दुसरे आवर्तन सोडले

By admin | Updated: January 31, 2015 00:25 IST

: डिंभे धरणातून यंदाचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून ५६०, तर डाव्या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे

डिंभे : डिंभे धरणातून यंदाचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून ५६०, तर डाव्या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यापैकी पॉवर हाऊसमधून ७००, तर आऊटलेटमधून ५० क्युसेक्स पाणी वळविण्यात आले आहे. दररोज डिंभे धरणातून ७५० क्युसेक्सच्या गतीने विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात ६१ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.आजतागायत या धरणाची पाणीपातळी ७९०.०५ वर आली असून, धरणात ६१ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. डाव्या कालव्यामधून सोडले जाणारे पाणी हे येडगाव धरणात सोडण्यात येते. पुढे ते कर्जत, पारनेर या नगर जिल्ह्यातील व करमाळा (जि. सोलापूर) तालुक्यातील गावांपर्यंत पोहोचविले जाते. उजव्या कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी हे घोडशाखा कालव्यामधून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील घोडेगाव, मंचर, निरगुडसर, लौकी, थोरांदळे मार्गे जांबूत, टाकळी हाजीमार्गे शिरूर तालुक्यातील गावांना सिंचनासाठी दिले जाते.डिंभे धरण १०० टक्के भरले होते. यंदाच्या हंगामात आक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान या धरणातून पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. या वेळी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली. दुसऱ्या आवर्तनापर्यंत पाणीसाठा ६१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आजतागायात या धरणात ६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २४ जानेवारीपासून धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स पाणी सुरू होते. काल (दि. २९) संध्याकाळी त्यात १० क्युसेक्सने वाढ केली आहे. याच वेळी उजवा कालवाही सुरू करण्यात आला असून, या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. एकंदरीत, धरणातून सध्या दररोज ७५० क्युसेक्स पाणी बाहेर सोडण्यात येत असल्याची माहीती डिंभे धरण शाखा अभियंत्यांकडून मिळाली आहे. सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा उपयोग नगर व पुणे याजिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतीक्षेत्राला सिंचनासाठी होणार आहे. (वार्ताहर)