शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

दौंड रेल्वेचे सांडपाणी रस्त्यावर

By admin | Updated: May 13, 2017 04:19 IST

येथील रेल्वे विभागातील सांडपाणी व तुडुंब भरलेल्या गटारींचा उपद्रव नगर परिषद हद्दीतील रहिवाशांना होत आहे. रेल्वे स्थानकातून

मनोहर बोडखे । लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : येथील रेल्वे विभागातील सांडपाणी व तुडुंब भरलेल्या गटारींचा उपद्रव नगर परिषद हद्दीतील रहिवाशांना होत आहे. रेल्वे स्थानकातून गटारींद्वारे शहरात येणारे हे पाणी थेट रस्त्यावरच येत आहे. यामुळे रस्ते तर नादुरुस्त होत आहेत, शिवाय दूषित आणि दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. रेल्वे कुरकुंभ मोरीत बाराही महिने सांडपाण्याचा संचार असतो. त्यामुळे मोरीतून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना सांडपाण्यातून जावे लागते. परिणामी या सांडपाण्यामुळे मोरीत दुर्गंधी पसरते. एखादे वाहन वेगात आल्यास हे सांडपाणी थेट पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वादविवाद वाढले आहेत. कुरकुंभ मोरीत येणारे सांडपाणी हे रेल्वे हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांचे आहे. याचबरोबर शहरातून एक मोठी गटार गेलेली आहे. या गटारातील सांडपाणी आणि घाण रेल्वे विभागातील आहे. हे गटर शहरातून जात असल्याने गटारीच्या स्वच्छतेची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे, असा भ्रम रेल्वे खात्याचा झालेला आहे. नियमाने ही साफसफाई रेल्वे खात्याने करणे बंधनकारक आहे, या मतावर नगर परिषद ठाम आहे. या वादात गटारे मात्र तुंबली असून, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. कुरकुंभ मोरीत सातत्याने सांडपाणी साचले जाते. नागरिकांना याचा त्रास होत असल्याने काही वेळेला नगर परिषदेने या मोरीची सफाई केली आहे, मात्र ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. सणावाराला मानवतेच्या दृष्टिकोनातून रेल्वे कुरकुंभ मोरीतील साफसफाई नगर परिषदेने केली आहे. काही झाले तर नगर परिषद साफसफाई करून घेते. हा समज रेल्वे खात्याचा झाल्याने कुरकुंभ मोरी आणि शहरातून गेलेल्या मोठ्या गटारी पूर्ण तुंबल्या आहेत. परिणामी संगम कॉलनी, नेने चाळ, खाटिक गल्ली, भीमथडी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांसह अन्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे ज्युनिअर लायब्ररी आणि नेनेचाळ यांच्या मधोमध रेल्वेचे उद्यान आहे. या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. यातील खेळणी कुजलेली आहेत. परिसरात साचलेल्या घाणीमुळे आणि दुर्गंधीमुळे नागरिक या ठिकाणी येण्याचे टाळत आहेत. या घाणीच्या साम्राज्यातून पाणीपुरवठा करणारे छोटे पाईप आहेत. यातील एका पाईपाला गळती लागल्यामुळे रस्त्यावरच पाण्याचे डबके झालेले आहे. ज्या ठिकाणी डबके झाले तेथे घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. याचा उपद्रव मात्र शहरातील नागरिकांना होत आहे. तेव्हा शहरी विभागातून जाणारी गटारे आणि रेल्वे कुरकुंभ मोरीची स्वच्छता करण्याची जबाबदारी स्वीकारावी तसेच रेल्वेच्या उद्यानाची दुरवस्था झालेली आहे ती थांबवणे गरजेचे आहे.