शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

गोदामे खुशाल सील करा!

By admin | Updated: January 14, 2015 23:59 IST

राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखान्यांची गोदामे सील करणार, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे राज्यातील कारखानदार धास्तावले आहेत.

सोमेश्वरनगर : राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखान्यांची गोदामे सील करणार, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे राज्यातील कारखानदार धास्तावले आहेत. सहकारमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक कारखानदारांनी नाराजी व्यक्त करीत गोदामे सील करणार असाल, तर खुशाल करा; पण सहकारमंत्री महोदय, तुम्हीच ती साखर ३२०० रुपयांनी विकत घ्यावी. आम्ही सरकारच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांना एफआरपी देऊ, अशी मागणी अनेक कारखानदारांनी व्यक्त केली आहे. तर, तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी टनाला जाहीर केलेले ४ हजार रुपये तूर्तास तरी एफआरपी देण्यासाठी उपयोग होऊ शकत नसल्याचे मत कारखानदारांनी व्यक्त केले. राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन सत्तर दिवस झाले. तरीही साखर कारखानदारांनी ऊसउत्पादकांना एफआरपी अदा केलेली नाही. या पार्श्वभूमीवर काल शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, सतीश काकडे, पृथ्वीराज जाचक यांच्यासह शेकडो शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे गेल्या सत्तर दिवसांपासून शांत आलेला ऊस काल पेटला. वास्तविक कारखाने सुरू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पहिला हप्ता देणे बंधनकारक असताना कारखान्यांनी शेतकऱ्यांना अजूनही उसाची रककम अदा केलेली नाही. दुसरीकडे मात्र कारखाने सुरू होऊन तीन वेळा साखरेचे दर कोसळल्याने राज्य बँकेने पोत्यावरील उचलीत तीन वेळा घट करीत शेतकऱ्यांना देण्यासाठी कारखानदारांच्या हातात अवघे १३१५ रुपये ठेवले आहेत. मग एफआरपी देणार कशी? एक तर शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने कारखान्यांना अनुदान द्यावे, नाहीतर सरकारनेचे ३२०० रुपयांनी साखर विकत घ्यावी. त्याचे रोख पैसे द्यावेत. आम्ही शेतकऱ्यांना लगेचच एकरकमी एफआरपी अदा करू, अशी भूमिका घेत सहकारमंत्र्यांच्या वकतव्यावर नाराजी व्यक्त केली आहे, तर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री यांनी निर्यात होणाऱ्या कच्चा साखरेला प्रतिक्विंटल ४०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. (वार्ताहर)