शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
6
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
7
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
8
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

मुरूमचोरांचा उद्योजकाच्या भूखंडावर डल्ला

By admin | Updated: June 18, 2015 22:38 IST

लहानमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी व्यावसायिकांनी एमआयडीसीकडून खरेदी केलेल्या भूखंडांमधून मोठ्या प्रमाणात मुरूम आणि माती यांची चोरी होत आहे.

आंबेठाण : लहानमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी व्यावसायिकांनी एमआयडीसीकडून खरेदी केलेल्या भूखंडांमधून मोठ्या प्रमाणात मुरूम आणि माती यांची चोरी होत आहे. याबाबत पोलीस आणि एमआयडीसी यांना कळवूनही या मुरूमचोरांवर कारवाई होत नसल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. ही चोरी करताना अन्य मालमत्तेचेदेखील नुकसान केले जाते.चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये सध्या भूखंडांचे वाटप आणि त्या भूखंडांचे विकसन करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी भूखंड घेतलेले अनेक व्यावसायिक परगावी राहतात. या परिसरासह आजूबाजूच्या भागातदेखील औद्योगिकीकरण होत आहे, तसेच बांधकाम व्यवसायदेखील तेजीत आहे. या ठिकाणी भरावासाठी मुरूम आवश्यक आहे. त्यासाठी असे भूखंड शोधले जातात आणि रात्री त्या ठिकाणी डल्ला मारून रातोरात त्याची चोरी करून तो अन्य ठिकाणी हलविला जातो आणि त्यामधून लाखो रुपये कमावले जात आहेत. त्याचप्रमाणे मातीचीदेखील चोरी केली जात आहे.याबाबत अनेक उद्योजकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे; परंतु पोलीसदेखील मूग गिळून गप्प आहेत. या चोरीबाबत महसूल विभाग तर चुप्पी साधून आहे. माहिती असूनही ते या मुरूमचोरांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. त्यांच्या या कारवाई न करण्यामागचे कारण मात्र गुलदस्तात आहे. अशा होणाऱ्या चोऱ्यांमुळे या भागात येणारे उद्योजक मात्र त्रस्त झाले आहेत. या परिसरात अनेक ठिकाणी स्वमालकीच्या भूखंडातून, तर काही ठिकाणी एमआयडीसीच्या मालकीच्या जागेतून ही चोरी केली जात आहे. या चोऱ्या बहुतांश रात्रीच्या वेळी केल्या जात आहेत. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी गस्त सुरू करण्याची मागणी केली जात आहे.याबाबत एमआयडीसीचे चिंचवड येथील कायर्कारी अभियंता पांगारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की या मुरूमचोरीबाबत तहसीलदारांना माहिती दिली आहे आणि पुन्हा अशा चोऱ्या होत असतील, तर नव्याने पुन्हा माहिती महसूलला देऊ. तसेच, वीजवितरण कंपनीलादेखील याबाबत माहिती दिली जाईल. (वार्ताहर)चोरी करताना वीजवितरण कंपनीचे खांबदेखील सोडले जात नाहीत. या खांबांना अगदी खेटून मुरूम आणि माती उकरली जात आहे. त्यामुळे हे खांब निराधार झाले असून, ते वाऱ्याने किंवा पावसाच्या माऱ्याने सहज कोसळतील, अशी स्थिती आहे. या वीजवाहिन्या ३३ के.व्ही.च्या आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही चोरी करताना उद्योजकांच्या अन्य मालमत्तेचे नुकसान केले जाते. यात भूखंडाला केलेले दगडी किंवा तारेचे कंपाऊंड पाडले जाते आणि नुकसान केले जाते.