शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमचोरांचा उद्योजकाच्या भूखंडावर डल्ला

By admin | Updated: June 18, 2015 22:38 IST

लहानमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी व्यावसायिकांनी एमआयडीसीकडून खरेदी केलेल्या भूखंडांमधून मोठ्या प्रमाणात मुरूम आणि माती यांची चोरी होत आहे.

आंबेठाण : लहानमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी व्यावसायिकांनी एमआयडीसीकडून खरेदी केलेल्या भूखंडांमधून मोठ्या प्रमाणात मुरूम आणि माती यांची चोरी होत आहे. याबाबत पोलीस आणि एमआयडीसी यांना कळवूनही या मुरूमचोरांवर कारवाई होत नसल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. ही चोरी करताना अन्य मालमत्तेचेदेखील नुकसान केले जाते.चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये सध्या भूखंडांचे वाटप आणि त्या भूखंडांचे विकसन करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी भूखंड घेतलेले अनेक व्यावसायिक परगावी राहतात. या परिसरासह आजूबाजूच्या भागातदेखील औद्योगिकीकरण होत आहे, तसेच बांधकाम व्यवसायदेखील तेजीत आहे. या ठिकाणी भरावासाठी मुरूम आवश्यक आहे. त्यासाठी असे भूखंड शोधले जातात आणि रात्री त्या ठिकाणी डल्ला मारून रातोरात त्याची चोरी करून तो अन्य ठिकाणी हलविला जातो आणि त्यामधून लाखो रुपये कमावले जात आहेत. त्याचप्रमाणे मातीचीदेखील चोरी केली जात आहे.याबाबत अनेक उद्योजकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे; परंतु पोलीसदेखील मूग गिळून गप्प आहेत. या चोरीबाबत महसूल विभाग तर चुप्पी साधून आहे. माहिती असूनही ते या मुरूमचोरांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. त्यांच्या या कारवाई न करण्यामागचे कारण मात्र गुलदस्तात आहे. अशा होणाऱ्या चोऱ्यांमुळे या भागात येणारे उद्योजक मात्र त्रस्त झाले आहेत. या परिसरात अनेक ठिकाणी स्वमालकीच्या भूखंडातून, तर काही ठिकाणी एमआयडीसीच्या मालकीच्या जागेतून ही चोरी केली जात आहे. या चोऱ्या बहुतांश रात्रीच्या वेळी केल्या जात आहेत. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी गस्त सुरू करण्याची मागणी केली जात आहे.याबाबत एमआयडीसीचे चिंचवड येथील कायर्कारी अभियंता पांगारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की या मुरूमचोरीबाबत तहसीलदारांना माहिती दिली आहे आणि पुन्हा अशा चोऱ्या होत असतील, तर नव्याने पुन्हा माहिती महसूलला देऊ. तसेच, वीजवितरण कंपनीलादेखील याबाबत माहिती दिली जाईल. (वार्ताहर)चोरी करताना वीजवितरण कंपनीचे खांबदेखील सोडले जात नाहीत. या खांबांना अगदी खेटून मुरूम आणि माती उकरली जात आहे. त्यामुळे हे खांब निराधार झाले असून, ते वाऱ्याने किंवा पावसाच्या माऱ्याने सहज कोसळतील, अशी स्थिती आहे. या वीजवाहिन्या ३३ के.व्ही.च्या आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही चोरी करताना उद्योजकांच्या अन्य मालमत्तेचे नुकसान केले जाते. यात भूखंडाला केलेले दगडी किंवा तारेचे कंपाऊंड पाडले जाते आणि नुकसान केले जाते.