शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

स्वच्छता ,सॅनिटायझरमुळे शिक्षकांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST

पुणे: राज्यातील नववी ते बारावीपर्यंचे वर्ग सुरू झाले असून, येत्या 27 जानेवारी रोजी पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार ...

पुणे: राज्यातील नववी ते बारावीपर्यंचे वर्ग सुरू झाले असून, येत्या 27 जानेवारी रोजी पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. शाळा सुरू झाल्या असल्या, तरी त्यासाठी लागणा-या खर्चाचा भार मुख्याध्यापक व शिक्षकांच्या खांद्यावर पडला आहे. स्थानिक जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासनाने शाळा स्वच्छता आणि सॅनिटायझरसाठी लागणारा निधी देण्यासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

पुणे जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या २०८६ शाळा आहेत.त्या शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या १२ लाख ३ हजार १२८ एवढी आहे. आत्तापर्यंत त्यातील १ हजार १४१ शाळा सुरू झाले असून या शाळांमध्ये १ लाख २१ हजार ५३४ विद्यार्थी उपस्थित राहत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी जिल्ह्यात ६८ टक्के शाळा सुरू झाल्या असून त्यात विद्यार्थी उपस्थिती केवळ १० टक्के आहे.राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या खडक नियमावलीचे पालन करणे अनेक शाळांना अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे अजूनही अनेक माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू झालेले नाहीत.

जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या पुणे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत केवळ दहा टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत. ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये 60 ते 80 टक्क्यांपर्यंत विद्यार्थी उपस्थिती दिसून येत असली तरी शहरी भागांमधील काही शाळांमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत सुद्धा विद्यार्थी उपस्थित राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. शहरी भागातील अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी तयार नाहीत. तसेच शाळांना हमीपत्र लिहून देण्यास पालक तयार नाहीत.

शहरातील शाळांनी कोरोनानंतर शाळा सुरू करण्यासाठी शासन नियमानुसार आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

------------------------