शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

समाजकल्याणच्या शाळांमध्ये विज्ञान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनुसूचित नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाने त्यांच्या शाळांमध्ये विज्ञान केंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अनुसूचित नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाने त्यांच्या शाळांमध्ये विज्ञान केंद्र सुरू केले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या प्रयत्नांमधून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. सरकारकडून समाजकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा चालवल्या जातात. जिल्ह्यात तरंगवाडी (इंदापूर), दिवे (पुरंदर), चांडोली (खेड) व आंबेगाव (पेठ) या ४ ठिकाणी इयत्ता ६ वी १० वीच्या ४ शाळा आहेत. प्रत्येकी २०० याप्रमाणे ८०० विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. या शाळांमध्ये प्रयोगशाळेची उणीव होती. एका खासगी संस्थेची मदत घेऊन या चारही शाळांमध्ये विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे.

येथे खगोलशास्त्रासह सर्व शास्त्रांमधील पायाभूत संकल्पना विद्यार्थ्यांना समजतील अशी विविध उपकरणे, पुस्तके, चित्रे तसेच प्रशिक्षित शिक्षकही आहेत. विद्यार्थ्यांना प्रयोग करून पाहण्याची, उपकरणे हाताळण्याची मुभा आहे. शहरी शाळांप्रमाणेच सुविधा येथील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समाजकल्याण जिल्हा सहआयुक्त संगिता डावखरे यांनी सांगितले की, या योजनेतंर्गत राज्यातल्या कोणत्याच शाळेत असे विज्ञान केंद्र नाही. सामान्य स्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याचा उद्देश यामागे आहे.