शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शाळा भरणार सकाळी

By admin | Updated: March 31, 2017 02:19 IST

१ एप्रिलपासून उन्हाळी वातावरणामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत सकाळी

राजेगाव : १ एप्रिलपासून उन्हाळी वातावरणामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत सकाळी शाळा भरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी नुकतेच एका परिपत्रकानुसार हे आदेश दिले आहेत.विद्यार्थ्यांना शिकविण्याचे तास दररोज चार तासांहून कमी असू नये, असेही परिपत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागात यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भयंकर उकाडा जाणवत आहे. चाळीसीच्या पुढे उन्हाचा पारा चढलेला आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावालाच पाणी पिण्यासाठी नसल्याने काही शाळेत फेब्रुवारी पासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यंदा उष्णतेचा पारा ४० अंशाच्या वर गेला आहे. त्यामुळे १ मार्च पासून पुणे जिल्हयातील शाळा सकाळी सूरू कराव्यात यासाठी सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे दरवर्षी प्रमाणे यंदाही पाठपुरावा केला होता. परंतु प्रशासनाने होकार न दिल्याने पुणे जिल्ह्यात १ मार्च पासून सकाळची शाळा सुरू झाली नाही. दरम्यान पुणे जिल्ह्णाच्या सिमेवर असणाऱ्या सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात मात्र १ मार्च पासूनच सकाळी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात १ मार्चपासून सकाळची शाळा सुरू करण्यासाठी सर्वच संघटनांनी पाठपुरावा केला होता . परंतु सकाळी ७ ते ११ या मर्यादित वेळेत आठवड्याच्या ४५ तासिका भरत नाहीत. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळेत येणारी गरीब, मजूर, शेतकरी, कामगारांची मुले दिवसभर शाळेत बसली तर त्यांचे कडक उन्हापासून संरक्षण होऊ शकते. अशी भुमिका िप्रशासनाने घेत १ एप्रिलाच सकाळची शाळा होईल, असे सांगितले होते.