शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शाळांसमोरील कोंडी फुटणार

By admin | Updated: September 3, 2016 03:20 IST

शहरातील मध्यवर्ती भागातील आणि उपनगरांमधील वर्दळीच्या ठिकाणच्या शाळांसमोरील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, लवकरच

पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील आणि उपनगरांमधील वर्दळीच्या ठिकाणच्या शाळांसमोरील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, लवकरच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली जाणार आहे. तसेच, शिक्षण विभागाचे अधिकारी वाहतूक पोलिसांशी याबाबत संवाद साधून या प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे. शहरातील मध्यवस्तीसह पुणे स्टेशन, कॅम्प, कोथरूड, वारजे, कोंढवा, येरवडा आदी भागांतील काही शाळा रस्त्याला लागून आहेत. परिणामी, शाळा भरण्यापूर्वी काही वेळ आणि शाळा सुटल्यानंतर अर्धा ते पाऊण तास शाळेच्या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होते. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या स्कूल बस, रिक्षा तसेच पालकांच्या चार चाकी व दुचाकी गाड्या रस्त्यावरच लावल्या जातात. शाळांकडे पार्किंगसाठी जागा नसल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावे व यावे लागते. बऱ्याच वेळा रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची शक्यता असते. शाळांसमोर दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. यावर शिक्षण विभागाने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.शालेय शिक्षण विभागाने २०११मध्ये तयार विद्यार्थी वाहतुकीबाबत नियमावली तयार केली असून त्यानुसार शाळांच्या प्रवेशद्वारासमोर खासगी वाहने, रिक्षा टॅक्सी थांबविण्यास परवानगी देऊ नये, वाहतूक पोलिसांशी चर्चा करून स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने शाळेजवळ आवश्यक चिन्हांकने आणि खुणा लावणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांशी चर्चा करून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पुरेशा संख्येत वाहतूक रक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. शाळेजवळ बसथांबे निश्चित करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमावलीचे पालन केले जात नाही. परंतु, शिक्षण विभागाकडून या नियमावलीच्या पालनासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाणार आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर म्हणाले, की शाळांसमोरील विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रथमत: वाहतूककोंडी होणाऱ्या शाळांचा शोध घेतला जाईल. एखाद्या परिसरातील अनेक शाळा एकाच वेळी सुटल्यास आणि शाळेतील सर्व विद्यार्थी एकाच वेळी प्रवेशद्वाराबाहेर आल्यास वाहतूककोंडी होते. मात्र, शाळा सुटण्याच्या वेळेत बदल केल्यास आणि सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी शाळेबाहेर न सोडता ५ ते १० मिनिटांच्या अंतराने सोडल्यास हा प्रश्न सुटू शकतो. यावर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनाचेही यासाठी सहकार्य घेतले जाईल.