शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शाळांसमोरील कोंडी फुटणार

By admin | Updated: September 3, 2016 03:20 IST

शहरातील मध्यवर्ती भागातील आणि उपनगरांमधील वर्दळीच्या ठिकाणच्या शाळांसमोरील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, लवकरच

पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील आणि उपनगरांमधील वर्दळीच्या ठिकाणच्या शाळांसमोरील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून, लवकरच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली जाणार आहे. तसेच, शिक्षण विभागाचे अधिकारी वाहतूक पोलिसांशी याबाबत संवाद साधून या प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे. शहरातील मध्यवस्तीसह पुणे स्टेशन, कॅम्प, कोथरूड, वारजे, कोंढवा, येरवडा आदी भागांतील काही शाळा रस्त्याला लागून आहेत. परिणामी, शाळा भरण्यापूर्वी काही वेळ आणि शाळा सुटल्यानंतर अर्धा ते पाऊण तास शाळेच्या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होते. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या स्कूल बस, रिक्षा तसेच पालकांच्या चार चाकी व दुचाकी गाड्या रस्त्यावरच लावल्या जातात. शाळांकडे पार्किंगसाठी जागा नसल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावे व यावे लागते. बऱ्याच वेळा रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांचे अपघात होण्याची शक्यता असते. शाळांसमोर दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. यावर शिक्षण विभागाने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.शालेय शिक्षण विभागाने २०११मध्ये तयार विद्यार्थी वाहतुकीबाबत नियमावली तयार केली असून त्यानुसार शाळांच्या प्रवेशद्वारासमोर खासगी वाहने, रिक्षा टॅक्सी थांबविण्यास परवानगी देऊ नये, वाहतूक पोलिसांशी चर्चा करून स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने शाळेजवळ आवश्यक चिन्हांकने आणि खुणा लावणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांशी चर्चा करून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पुरेशा संख्येत वाहतूक रक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. शाळेजवळ बसथांबे निश्चित करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमावलीचे पालन केले जात नाही. परंतु, शिक्षण विभागाकडून या नियमावलीच्या पालनासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाणार आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर म्हणाले, की शाळांसमोरील विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रथमत: वाहतूककोंडी होणाऱ्या शाळांचा शोध घेतला जाईल. एखाद्या परिसरातील अनेक शाळा एकाच वेळी सुटल्यास आणि शाळेतील सर्व विद्यार्थी एकाच वेळी प्रवेशद्वाराबाहेर आल्यास वाहतूककोंडी होते. मात्र, शाळा सुटण्याच्या वेळेत बदल केल्यास आणि सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी शाळेबाहेर न सोडता ५ ते १० मिनिटांच्या अंतराने सोडल्यास हा प्रश्न सुटू शकतो. यावर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनाचेही यासाठी सहकार्य घेतले जाईल.